शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

योग्य समन्वय ठेऊन पाणी पुरवठा केला जाईल, आयुक्त कलशेट्टी यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:30 AM

कोल्हापूर शहरात पिण्याचे पाणी भरपूर आहे; मात्र केवळ आपल्यातील विस्कळीतपणामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे; त्यामुळे नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात योग्य समन्वय ठेवून योग्य व पुरेशा पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाईल, असे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी झालेल्या स्थायी समिती सभेत सांगितले. नगरसेवकांनीसुद्धा त्यांच्या भागात काही अडचणी असतील, तर त्या लेखी स्वरूपात द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देयोग्य समन्वय ठेऊन पाणी पुरवठा केला जाईलआयुक्त कलशेट्टी यांची स्थायी सभेत ग्वाही

कोल्हापूर : शहरात पिण्याचे पाणी भरपूर आहे; मात्र केवळ आपल्यातील विस्कळीतपणामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे; त्यामुळे नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात योग्य समन्वय ठेवून योग्य व पुरेशा पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाईल, असे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी झालेल्या स्थायी समिती सभेत सांगितले. नगरसेवकांनीसुद्धा त्यांच्या भागात काही अडचणी असतील, तर त्या लेखी स्वरूपात द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.शहरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नियोजनाचा अभाव, गळती, यामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी सभापती शारंगधर देशमुख व संदीप कवाळे यांनी सभेत केली. त्यावेळी आयुक्तांनी त्याची दखल घेत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.शहरातील जलवाहिन्यांची गळती काढण्याचे काम सुरूआहे. त्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कामाच्या वेळेचे नियोजन करताना अधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे.

अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर हे पाणी पुरवठा विभागाकडे, तसेच पाणी पुरवठा सुरळीत सुरूराहण्यासाठी लक्ष देतील. त्यांनी वेळोवेळी फिरती करावी. जेथे माझी आवश्यकता असेल, त्या ठिकाणी मी स्वत: येऊन पाहणी करतो. सदस्यांनी व प्रशासनाने एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असे सांगितले.अमृत योजनेच्या कामांचा आढावा मी आठवड्यात घेणार आहे. ही कामे गतीने पूर्ण व्हावीत, अशी आपली अपेक्षा आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.शिंगणापूर येथे पाणी उपसा करण्याकरिता पाचवा पंप खरेदीची प्रक्रिया सुरू करणार आहे. पाचव्या पंपाद्वारे तासाला सात लाख लिटर्स पाण्याचा डिस्चार्ज वाढेल; त्यामुळे ई वॉर्डला पाणी पुरवठा करता येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.झुम प्रकल्पामधील कचऱ्यावर प्रक्रिया करून कॅपिंग करण्यात येणार आहे; परंतु तेथे जमिनीखालून लिचड वाहत असून, ते बंद करावे; त्यामुळे परिसरातील विहिरी व बोअरला दुर्गंधीयुक्तपाणी येत आहे, असे माधुरी लाड यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर खुलासा करताना मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले की, सध्या जो कचऱ्याचा ढिग आहे, त्यावर प्रक्रिया करून कॅपिंग करण्यात येणार आहे. हे काम १५ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यामधील कोणतीही लिचड वाहणार नाही.बऱ्याच वर्षांनी आयुक्त स्थायी सभेतमहापालिकेच्या स्थायी समिती सभेत अत्यंत महत्त्वाचे आर्थिक निर्णय होत असतात. धोरणे ठरत असतात. कोट्यवधींची कामे मंजूर केली जातात; परंतु या सभेला आयुक्त म्हणून सहा-सात वर्षांत कोणी उपस्थित राहिले नाहीत. स्थायी सभेस उपस्थित राहावे, असे कोणतेच बंधन आयुक्तांवर नाही; त्यामुळे आतापर्यंत आलेल्या आयुक्तांनी दांड्या मारल्या; परंतु डॉ. कलशेट्टी यांनी सभेस उपस्थित राहून, आपण महिन्यातून एक-दोन सभांना येईन, अशी ग्वाही दिली.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर