शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रूग्णालयांत वाढली मुलांची गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST

कोल्हापूर : सध्या जिल्ह्यातील कोरोना संकट कमी झाले असले तरी व्हायरल सर्दी, तापाचे संकट घोंघावत आहे. याचा सर्वाधिक परिणाम ...

कोल्हापूर : सध्या जिल्ह्यातील कोरोना संकट कमी झाले असले तरी व्हायरल सर्दी, तापाचे संकट घोंघावत आहे. याचा सर्वाधिक परिणाम बालकांवर होत असून, त्यामुळे रुग्णालयांमध्ये मुलांची गर्दी वाढली आहे. वातावरणात सातत्याने होत असलेले बदल, थंड हवामान, पाऊस, कधी कडक ऊन यामुळे या बाबी घडत आहेत, त्यामुळे बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.

दुसऱ्या लाटेत तीन महिने जिल्ह्यात ठाण मांडलेल्या कोरोनाचे संकट आता कमी झाले आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची मानली जात असली तरी त्या आधीपासूनच बालकांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. जुलै महिन्यात महापूर येऊन गेल्यानंतर पाऊसच पडलेला नाही. त्यानंतर पुढे काही दिवस तर कडकडीत ऊन पडत होते. आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा आहे. श्रावणात तर सगळा ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. याचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत आहे. कधी कडक ऊन, कधी थंडी, पाऊस यामुळे बालकांना सर्दी, ताप, खोकला होत आहे. शिवाय श्वसनाचे आजार निर्माण होत आहेत.

---

कोरोना नाही, डेंग्यूचेही संकट

जिल्ह्यात सध्या डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आहे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्य डेंग्यूने आजारी आहेत. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतरही आजार कमी झाला नाही तर डेंग्यू, न्युमोनियासाठीच्या तपासण्या केल्या जातात.

---

ही घ्या काळजी

- थंडी, पावसाळ्यात मुलांना स्वेटर, टोपी, हात-पाय मोजे यासारखे गरम कपडे घालून ठेवा.

- न्युमोनियाची नवीन लस आली ती आवर्जून द्या.

- रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पालेभाज्या, कडधान्य, डाळी, उसळ अशा पदार्थांचा जेवणात समावेश करा.

----

लसीकरण वेळेत होणे गरजेचे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नवजात बालकांसाठी १२ जुलैपासून न्युमोनियावर नवीन लस आणली आहे. नवजात बालकांना अन्य लसीच्या डोसबरोबरच ही लसदेखील द्या. शिवाय त्यांचे पाच वर्षांपर्यंतचे ठरलेले लसीचे डोस नियमित दिले तर अनेक रोगांपासून बालकांचा बचाव होतो. ते वेळेवर देणे गरजेचे आहे.

--

लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे वातावरणातील बदलांचा त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, न्युमोनिया आणि श्वसनाचे आजार होतात. त्यापासून बचावासाठी ५ वर्षांपर्यंतचे डोस नियमित दिले पाहिजेत. तसेच नव्याने आलेली न्युमोनियाची लस आवर्जून द्यावी.

- डॉ. एल. एस. पाटील (बालरोगतज्ज्ञ)

--

फोटो ०८०९२०२१-कोल-बालरुग्ण ०१,०२

ओळ : वातावरणातील बदलांमुळे बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयांमध्ये बालकांची गर्दी झाली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)

---