शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:24 IST

गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे गावांनी तालुका आणि तालुक्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआराखडे सादर करण्यासाठी ७ जूनपर्यंत मुदत आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिक सजग

कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे गावांनी तालुका आणि तालुक्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत संभाव्य पुराच्या अनुषंगाने आराखडे तयार करून यंत्रणा तैनात केली जाते; पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने सर्व यंत्रणेवर ताण आला. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी इतर नुकसान मोजण्याच्या पलीकडचे होते.  या पार्श्वभूमीवर यंदा अधिक दक्षता बाळगत पूरबाधित गावांना संभाव्य आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आराखड्यांत गावात किती पाऊस होतो, अतिवृष्टी होणारी ठिकाणे, किती लोक पूरबाधित होऊ शकतात, त्यांच्या स्थलांतराची, निवाऱ्याची काय व्यवस्था असणार, आपत्तीचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची साधनसामग्री उपलब्ध आहे, कोणती आवश्यकता आहे, याची विस्तृत माहिती द्यावी लागणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर गावांनी तालुका तहसीलदारांकडे , तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तो सादर करावयाचा आहे.आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्कजिल्हाधिकारी कार्यालयात असलेला आपत्ती व्यवस्थापन कक्ष १ जूनपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. आताही ३५ कर्मचाऱ्यांमार्फत तीन पाळ्यांमध्ये रात्रंदिवस काम चालते; पण १ जूनपासून यात पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, महसूल या यंत्रणांतील आणखी १० जण समाविष्ट करून घेतले जाणार आहे. ४५ जणांसह हा कक्ष ऑक्टोबरपर्यंत अहोरात्र सुरू राहणार आहे.जिल्ह्यातील पूरबाधित गावेशिरोळ ४२, हातकणंगले २३, करवीर ५७, कागल ४१, राधानगरी २२, गगनबावडा १९, पन्हाळा ४७, शाहूवाडी २५, गडहिंग्लज २७, चंदगड ३०, आजरा ३०, भुदरगड २३

गेल्या वर्षासारखाचा पूर यंदाही येईल, असे गृहीत धरून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला लागली आहे. जनजागृती व सज्जता तपासण्यासाठी आपत्तीतील बचावाची प्रात्यक्षिकेही घेतली जात आहेत.प्रसाद संकपाळ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर