शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

आगीमुळे जंगलातील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST

सदाशिव मोरे। आजरा : जंगलांना लावल्या जाणाऱ्या आगीमुळे आजरा तालुक्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वृक्षलागवडीप्रमाणे जंगलसंवर्धनाची गरज आहे. जंगलसंवर्धनासाठी ...

सदाशिव मोरे।

आजरा : जंगलांना लावल्या जाणाऱ्या आगीमुळे आजरा तालुक्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वृक्षलागवडीप्रमाणे जंगलसंवर्धनाची गरज आहे. जंगलसंवर्धनासाठी नागरिकांच्या प्रबोधनाचीही गरज आहे. जंगलातील आगीमुळे जंगली जनावरांचा चारा, पशू, पक्षी, प्राणी, कीटक व त्यांचा अधिवास होरपळून जात आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे व अतिसंवेदशील असणारे आजरा तालुक्यातील जंगल आगीमुळे नष्ट होत आहे.

वृक्षलागवडीबरोबर जंगलसंवर्धनाची लोकचळवळ उभी राहिली, तरच यापुढील काळात नागरिकांना मोकळा श्वास मिळणार आहे. जैवविविधता व निसर्गसौंदर्याने नटलेला आजरा तालुक्यातील परिसर आहे. भारतीय उपखंडात आढळणाऱ्या वनस्पतींपैकी ६९४ प्रजाती आजऱ्याच्या जंगलात सापडतात. सस्तन प्राण्यांच्या ४० पेक्षा जास्त प्रजाती व २,२२७ सपुष्प वनस्पतींच्या नोंदी आहेत. ६० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात.

हिरडा, ऐन, जांभूळ, दालचिनी, साग, आंबा, चंदन, सिसम, किंजळ, रानबाबूळ, खैर या वृक्षसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हत्ती, गवे, अस्वल, वाघ, बिबट्या, तरस, रानडुक्कर, कोल्हा यासारखे जंगली प्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत.

सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता व जंगलांना लावली जाणारी मानवनिर्मित आगीमुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जंगलांचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन केले जात आहे. मात्र, आजरा तालुक्यातील १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील जैवविविधता मानवनिर्मित आगीत भस्मसात होत आहे, असे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या नागरिकांवर वन विभागांकडून कारवाईची गरज आहे.

फेब्रुवारी ते मेअखेर वन विभागाच्या प्रत्येक रेंजमध्ये कर्मचारी, वाढविणे, वनमित्रांची मदत घेऊन लागलेली आग तातडीने नियंत्रित आणणे, आग विझविण्यासाठी ब्लोअरचा वापर करणे, पाण्याच्या टँकरची उपलब्धता करणे गरजेचे आहे. आगीमुळे सरपटणारे प्राणी होरपळतात, तर काही प्राणी जायबंदी होऊन मृत्युमुखी पडतात. वणव्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते.

भविष्यकाळात मोकळा श्वास घेता यावा यासाठी जंगलसंवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याची गरज आहे. आगीमुळे जंगलातील वृक्षसंपदेबरोबर खाजगी मालकीतील वृक्षसंपदाही नष्ट होत आहे.