शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

असुरक्षित इचलकरंजी-- दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:05 IST

इचलकरंजी महाराष्टचे मॅँचेस्टर, वस्त्रोद्योग नगरी, मुंबईप्रमाणे कुणालाही सामावून घेणारी, ‘रोजगार देणारी नगरी’ म्हणून या शहराची ओळख. मात्र, आज ही ओळख हरवून जाते की काय? अशी भीती तमाम इचलकरंजीकरांना लागली आहे की नाही माहीत नाही. मात्र, तेथील काही यंत्रमागधारकांशी चर्चा केल्यानंतर मात्र तसे जाणवते हे निश्चित.

-चंद्रकांत कित्तुरेइचलकरंजी महाराष्टचे मॅँचेस्टर, वस्त्रोद्योग नगरी, मुंबईप्रमाणे कुणालाही सामावून घेणारी, ‘रोजगार देणारी नगरी’ म्हणून या शहराची ओळख. मात्र, आज ही ओळख हरवून जाते की काय? अशी भीती तमाम इचलकरंजीकरांना लागली आहे की नाही माहीत नाही. मात्र, तेथील काही यंत्रमागधारकांशी चर्चा केल्यानंतर मात्र तसे जाणवते हे निश्चित. शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाला आहे. एका यंत्रमागापासून आज सुमारे दीड लाख साधे यंत्रमाग, सुमारे २० हजार आॅटो आणि सेमी आॅटोलूम, या यंत्रमागांशी संबंधित सायझिंग, सूतगिरण्या, रेडिमेड कपड्यांच्या कारखान्यांसह वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या सर्वच उत्पादनांचे ते केंद्र बनले आहे.

यंत्रमाग व्यवसाय हा विकेंद्रित व्यवसाय आहे. यामुळे येथे कुणीही यावे व काम करून पोट भरावे, स्वत:चा विकास साधावा, अशी येथील परिस्थिती. मी लहान असताना बाहेरील राज्यातून आलेले साधे यंत्रमाग कामगार, हमाल आज कारखानदार किंवा व्यावसायिक बनले आहेत. मूळचे इचलकरंजीकर मात्र आहे तेथेच दिसत आहेत. कारण ते छोटे यंत्रमागधारक आहेत. स्वत:च कुटुंब चालतयं त्यात समाधानाने जगता येतंय, कशाला जादा व्याप, अशी अनेकांची भूमिका. तेजी-मंदीच्या चक्रात अडकणाऱ्या वस्त्रोद्योगात धोका पत्करण्याची तयारी नसायची, त्यामुळे ते आहेत तिथेच आहेत. ज्यांनी धोका पत्करला, दूरदृष्टीने व्यवसायात आधुनिकता आणली, व्यवसाय बदलला, त्यांनी मात्र प्रगती केल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

हे सगळे आता सांगायचे कारण म्हणजे, गेल्या आठवड्यात इचलकरंजीला जाण्याचा योग आला. तेथील एक दूरदृष्टीने व्यवसायात प्रगती करणारे कारखानदार असलेल्या नातेवाइकांकडे गेलो होतो. शुक्रवारचा दिवस होता म्हणजे तमाम इचलकरंजीकरांचा वाढदिवस. कारण हा दिवस पगाराचा. आठवडा बाजाराचा. बहुतेकांच्या घरी रात्रीचा सामिष आहार ठरलेला. दुपारी चारच्या सुमारास बसवेश्वरनगर वैरण बाजार परिसरातून दोन परप्रांतीय कामगार बाजाराच्या दिशेने चाललेले. एवढ्यात समोरून मोटारसायकलवरून दोघेजण आले. त्यांनी या दोघांना अडविले. ‘दोन-दोनशे रुपये द्या, अन्यथा तुम्हाला सोडणार नाही,’ असे म्हणत त्यांना दम देऊ लागले. चार खून केले आहेत. माझे काही वाकडे झाले नाही, असेही त्यातील एकजण दम देताना म्हणत होता. परप्रांतीय असल्याने हे दोघेही घाबरले. काय करावे, ते त्यांना सुचत नव्हते.

एवढ्यात योगायोगाने समोरून त्यांचे मालक म्हणजेच नातेवाईक कारखानदार मोटारसायकलवरून पत्नीसह येत होते. त्यांना पाहताच यांच्या जिवात जीव आला. त्यांना थांबवून ‘अण्णा, दोनशे रुपये द्या,’ असे म्हणू लागले. ‘सकाळी तर पगार दिलाय पुन्हा कशाला पैसे मागताहेत असे वाटून ‘कशाला रे,’ असे मालकाने विचारताच त्या दोघांकडे बोट दाखून ते आपल्याला दम देऊन पैसे मागत आहेत त्यांना द्यायला पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. हे ऐकून मालक मोटारसायकलवरून खाली उतरले आणि त्या दोघांना कसले पैसे पाहिजेत, असे विचारू लागले. मालक अंगापिंडाने मजबूत असल्याने आणि आवाजात जरब असल्याने लगेच त्यातील एकाने दारूला पैसे पाहिजेत म्हणून मागत होतो, असे सांगितले. हे ऐकून मालकाने एकाच्या दोन कानशिलात लगावताच तो नरमला. दरम्यान, आपल्या भागातील कारखानदार थांबल्याचे पाहून त्या रस्त्यावरून जाणारे अन्य काही कारखानदारही थांबले. कामगाराला धमकी देऊन पैसे उकळत असल्याचे समजताच त्यांनीही आपले हात धुऊन घेतले. एकाला मारहाण होताना पाहून दुसरा पळून गेला. याची यथेच्छ धुलाई होताच तो हाता-पाया पडू लागला. त्यामुळे त्यालाही सोडून देण्यात आले. पोलिसांचे झंझट पाठीमागे नको म्हणून पोलिसांच्या ताब्यात देण्याचे त्यांनी टाळले. खरेतर त्याला पोलिसांत द्यायलाच हवे होते; पण पोलिसांबद्दलचे गैरसमजही असे करायला भाग पाडतात. हे सविस्तर सांगण्याचे कारण इतकेच की, इचलकरंजी किती असुरक्षित बनली आहे ते कळावे.

गेल्याच आठवड्यात एका व्यावसायिकाला असेच दोघांनी लुटले. पोलिसांनी याचा छडा लावला; पण पोलिसांपर्यंत न जाणारे असे किती गुन्हे असतील? सध्या इचलकरंजी तीव्र मंदीच्या वाटेवरून चालत आहे. बहुतेक यंत्रमाग आठवड्यात केवळ तीनच दिवस चालू आहेत. कामगार आणि छोटे यंत्रमागधारक यांचे कसेतरी कुटुंब चालावे, अशीच तेथील स्थिती आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळेच ही परिस्थिती ओढावल्याचे अनेकांचे मत आहे. अधून-मधून एखादा व्यापारी कोट्यवधीचे दिवाळे काढून जातो. यामुळेही यंत्रमागधारकही असुरक्षित आहेत. पुरेसे काम आणि पगार मिळत नसल्याने गुंडगिरी वाढू लागली आहे. यामुळे कामगारांसह सर्वसामान्य नागरिकही स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत. ही असुरक्षितता घालविण्याचे काम शासन, पोलीस आणि लोकप्रतिनिधी करतील, तरच इचलकरंजीची खरी ओळख टिकून राहील.(लेखक ‘लोकमत’चे उप वृत्तसंपादक आहेत.)kollokmatpratisad@gmail.com

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी