शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

मोबाईल कंपनीचा अनलिमिटेड पॅक लिमिटेड, नवीन दराची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 11:31 AM

मोबाईल कंपनीच्या बदलेल्या दरामुळे ‘अनलिमिटेड पॅक’ योजना आता मोडीत निघाली आहे. ‘कंपनी टू कंपनी कॉलिंग’ मोफत राहणार असले तरी इतर कंपनीच्या मोबाईल ग्राहकांशी बोलण्यास मर्यादा आल्या आहेत. महिन्याला एक हजार मिनिटेच मोफत कॉलिंग करता येणार आहे. त्याच्यावर बोलण्यासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देदुसऱ्या मोबाईल कंपनीच्या ग्राहकांशी बोलण्यास मर्यादा एक हजार मिनिटांनंतर जादा पैसे मोजावे लागणार

विनोद सावंत

कोल्हापूर : मोबाईल कंपनीच्या बदलेल्या दरामुळे ‘अनलिमिटेड पॅक’ योजना आता मोडीत निघाली आहे. ‘कंपनी टू कंपनी कॉलिंग’ मोफत राहणार असले तरी इतर कंपनीच्या मोबाईल ग्राहकांशी बोलण्यास मर्यादा आल्या आहेत. महिन्याला एक हजार मिनिटेच मोफत कॉलिंग करता येणार आहे. त्याच्यावर बोलण्यासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर अनलिमिटेडचे पॅक सुमारे ५० रुपयांनी महाग झाले आहेत. नवीन दराची सोमवारी रात्री १२ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.मोबाईल कंपन्यांमध्ये टोकाची स्पर्धा आहे. एकमेकांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणल्या जात आहेत. मोबाईल नंबर न बदलता दुसऱ्या कंपनीचे ग्राहक होण्यासाठीची पोर्टेबिलिटी योजना आल्यामुळे तर स्पर्धा कमी होण्याऐवजी वाढली. गेल्या काही वर्षांपासून या योजनेमुळे कंपनीची ग्राहक संख्या जर वाढली असली तरी तोट्यात मात्र, वाढ होत राहिली.

अखेर सरकारची मंजुरी घेऊन दरवाढीचा निर्णय घेण्याची वेळ या कंपन्यांवर आली आहे. मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासूनच कॉल आणि इंटरनेटच्या दरात ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे. परिणामी पहिल्यांदा सवय लावायची आणि नंतर दरवाढ करायची या कंपनीच्या खेळीमुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनलिमिटेड पॅकचे पूर्वीचे दर           बदललेला दर

१९९ रुपये (२८ दिवस)                      २४९ रुपये३९९ रुपये (८४ दिवस)                      ५९९ रुपयेदुसऱ्या कंपनीच्या ग्राहकांची बोलण्याची मर्यादा - एक हजार मिनिटे

एकदा अनलिमिटेड पॅक मारल्यानंतर महिन्यात अथवा तीन महिन्यांच्या पॅकनुसार कोणाशीही कितीही वेळ बोलता येत होते. त्यामुळे ग्राहकांचा कल अनलिमिटेड पॅक घेण्याकडेच होता. आता इतर कंपनीच्या ग्राहकांना आवश्यकतेनुसारच बोलावे लागणार आहे. त्यामुळे नवीन नियमांमुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.- गणेश कुष्ठे, मोबाईल रिचार्ज विके्रता

रिचार्ज मारणाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होणारनवीन नियमामुळे कंपनीचा तोटा कमी होणार आहे तर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दुसरीकडे रिचार्ज मारणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत. ‘अनलिमिटेड पॅक’चे दर वाढल्यामुळे तसेच एक हजार मिनिटांनंतर पुन्हा रिचार्ज मारावे लागणार असल्यामुळे रिचार्ज मारणाºयांच्या व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे आहेत. 

 

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूर