शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

शिधापत्रिकांच्या पात्रतेसाठी दुचाकीचा निकष अन्यायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 4:53 PM

राज्य शासनाने नुकताच अन्नसुरक्षा कायद्यातील अपात्र लाभार्थ्यांच्या शोधमोहिमेसाठी नवे निकष जाहीर केले आहेत. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहन असणाऱ्यांना या कायद्यातून वगळण्याचा निर्णय विचाराधीन आहे. हा निर्णय सर्वसामान्य मध्यमवर्गीयांवर अन्यायकारक आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष वोरा व सरचिटणीस समीर नदाफ यांनी  दिला आहे.

ठळक मुद्देशिधापत्रिकांच्या पात्रतेसाठी दुचाकीचा निकष अन्यायी ‘कोल्हापूर जनशक्ती’चा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर: राज्य शासनाने नुकताच अन्नसुरक्षा कायद्यातील अपात्र लाभार्थ्यांच्या शोधमोहिमेसाठी नवे निकष जाहीर केले आहेत. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहन असणाऱ्यांना या कायद्यातून वगळण्याचा निर्णय विचाराधीन आहे. हा निर्णय सर्वसामान्य मध्यमवर्गीयांवर अन्यायकारक आहे. हा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष वोरा व सरचिटणीस समीर नदाफ यांनी  दिला आहे.जिल्ह्यात अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत साधारण २६ लाख २६ हजार ६५३ लाभार्थी असल्याचे सांगितले जाते, परंतु प्रशासनाने केलेल्या बायोमेट्रिकच्या गोंधळामुळे यापैकी बहुतांश लोकांचे ठसे जुळत नाहीत. परिणामी, अनेकजण धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यातच आता यातील अपात्र शिधापत्रिकाधारक शोधण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांचा निकष सरकार लावू पाहत आहे.

जिल्ह्यात आज साधारण तीन माणसांमागे एक असे वाहनाचे प्रमाण आहे. बँकाही एका तासात कमी कागदपत्रात वाहन कर्ज उपलब्ध करून देतात. दुचाकी वाहन हे आजच्याप्रमाणे श्रीमंतीचे लक्षण नाही, तर ती गरज बनली आहे. एकीकडे केंद्रातील सरकार वार्षिक आठ लाख उत्पन्न असणाऱ्यां कुटुंबांना आर्थिक दुर्बलच्या व्याख्येत आणून त्यांच्यासाठी सवलती जाहीर करते. तर दुसरीकडे एक लाख उत्पन्नाची तुटपुंजी मर्यादा कायम राखत केशरी कार्डधारकांची कुचेष्टा करते. ही बाब दुर्दैवी असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर