शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

धामणी खोऱ्यातील दोन गावं ‘गावपळण’साठी वेशीबाहेर ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कसबा तारळे : ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा व ग्रामदैवतेवरील श्रद्धेपोटी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा तारळे : ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा व ग्रामदैवतेवरील श्रद्धेपोटी गाव पळणची प्रथा आजही कायम आहे. राधानगरी तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या धामणी खोऱ्यातील चौके व मानबेट या दोन गावांतील ग्रामस्थ कुटुंबकबिल्यासह ‘गावपळण’साठी रविवार (दि. २८)पासून पुढील पाच दिवस गावच्या वेशीपासून दूर राहणार आहेत. दर तीन वर्षांनंतर ही गावपळण होते.

पाच दिवसांनंतर ग्रामदैवत रासाईदेवीचा कौल घेऊन मगच गावात गावकरी परतणार आहेत. कदाचित कौल झाला नाही, तर मुक्काम वाढण्याचीही शक्यता आहे. गावपळणच्या काळात वरील दोन गावांत लाईट बंद असून चूल किंवा दिवाबत्तीचा उजेडही केला जात नाही. इतकेच नव्हे तर घराच्या दरवाजांना कडीकोंयडा लावत नाहीत. गावच्या वेशीच्या आत किंवा हद्दीतील असणाऱ्या शेती शिवारातही ग्रामस्थ फिरकत नाहीत. या पाच दिवसांच्या काळात गावात नीरव शांतताच पाहावयास मिळते.

कुणीही या प्रथेबद्दल ठोस माहिती देत नसली तरीही वयोवृद्ध मंडळींच्या माहितीनुसार, चार पिढ्यांपासून ही प्रथा वरील दोन गावांत सुरू आहे. या प्रथेला कोणी विरोध केला तर गावात काहीतरी अघटित घडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. गावापासून दूर गेल्याने ही मंडळी मोकळ्या जागेत किंवा माळरानावर पाल किंवा झोपडी मारून समुदायाने राहतात. शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गुरेढोरे यांचीही सोय एकत्रित केलेली असते. गावात असताना आपापसातील भांडण-तंटे या काळात येथे पाहावयास मिळत नाहीत. याउलट ही गावपळण म्हणजे एक प्रकारचा उत्सव समजून नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर असणारी या दोन्ही गावांतील मंडळी या निमित्ताने वेळ काढून कुटुंबासह या गावपळणमध्ये सहभागी होतात.

एकंदरीत गावपळणच्या निमित्तानं गावच्या वेशीपासून दूर राहणाऱ्या दोन गावांतील नागरिकांसह या काळातील त्यांच्या जीवनशैलीचे अप्रूप तालुक्यासह जिल्ह्याला वाटत आहे.

कोट --

गावपळणची प्रथा माझ्या आजा-पंजा-वडिलापासून सुरू आहे. हल्लीची तरुण पिढी याबद्दल नाक मुरडते. जे चांगलं आहे ते पाळायला काय हरकत आहे आणि त्यापासून काय त्रास नाही.

चंद्राप्पा विठ्ठल पाटील

(पंचाहत्तर वर्षीय, चौके ग्रामस्थ )

-

फोटो कॅप्शन-- गावपळणच्या निमित्ताने गावाबाहेर ग्रामस्थांनी उभा केलेले मांडव व झोपड्या.

२,३,संपूर्ण गावच स्थलांतरित झाल्याने गावात अशाच शुकशुकाट दिसत आहे.

( छायाचित्र/ रमेश साबळे )