शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

विरोधी आघाडीचे दोन नेते सत्तारूढ गटाच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत शह काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी गटाला खिंडार पाडत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत शह काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी गटाला खिंडार पाडत विरोधकांनी बाजी मारली असली तरी विरोधी गटातील दिग्गजांना आपल्याकडे वळविण्यात सत्तारूढ गटाला काहीसे यश आले आहे. दोन ताकदीचे नेते सत्तारूढ गटाच्या संपर्कात आहेत. स्थानिक राजकीय अडचणीमुळे त्यांची गोची झाल्याने अंतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत.

‘गोकुळ’च्या निवडणूकीत सत्तारूढ गट भक्कम आहे, असे वाटत असतानाच एका पाठोपाठ एक धक्के देत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहा संचालकांना आपल्या बाजूने वळविले. सोमवारी विरोधी आघाडीसोबत नेत्यांची फौज उभी करून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. या उलट सत्तारूढ गटाने अगदी शांतपणे शहला काटशहाचे राजकारण सुरू केले. महाविकास आघाडी म्हणून एकसंध झाले असले तरी प्रत्येकाची राजकीय अडचण मोठी आहे. ‘करवीर’ वगळता सगळीकडे विधानसभेसह सर्वच निवडणुकीत एकमेकाविरोधात लढलेले आघाडीत एकत्र आल्याने त्याचे पडसादही तालुक्याच्या राजकारणात उमटण्यास सुरुवात झाली. त्यातूनच राधानगरी, भुरदगड, चंदगड, शाहूवाडी तालुक्यातील नेत्यांची गोची झाली आहे. येथे विधानसभा, साखर कारखान्याचे राजकारण आघाडीसाठी आडवे येत असल्याने पुढील काळात येथे मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे.

शाहूवाडी शिवसेनेतही खदखद

माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर हे सत्तारूढ गटासोबतच राहणार हे निश्चित होते. मात्र, ‘मातोश्री’वरून आलेल्या आदेशानंतर त्यांना भूमिका बदलावी लागली. त्यात त्यांचे कट्टर विरोधक आमदार विनय काेरेही शाहू आघाडीसोबत आल्याने त्यांच्या गटाची गोची झाली आहे. सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आले, असा संदेश जनतेमध्ये गेला आहे. यातूनच शाहूवाडी शिवसेनेत काहीशी खदखद दिसत आहे.

अंदाज बघून उड्या सुरूच राहणार

काहीजण कोणते पॅनेल सक्षम होणार, याचा अंदाज घेत आहेत. त्यानुसार भूमिका घेत असून अर्ज माघारीपर्यंत अनेकांच्या उड्या सुरू राहणार आहेत. त्यातून दोन्ही गटाच्या नेत्यांना धक्के बसणार हे निश्चित आहे.

‘राधानगरी’तून रवीश पाटील यांचे नाव पुढे

राधानगरीतून उपसभापती रवीश पाटील-कौलवकर यांचे नाव पुढे येत आहे. ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील -कौलवकर यांचे राधानगरीसह भुदरगड, करवीरमध्ये चांगले नेटवर्क असल्याने त्या संबंधाचा पॅनेलला फायदा होऊ शकतो.