वीस वर्षे लोटली तरी जमीन नाहि, केळोशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 06:33 PM2021-05-20T18:33:07+5:302021-05-20T18:41:15+5:30

Dam Kolhapur : वीस वर्षापूर्वी ज्या २७ कुटुंबीयांची जमीन केळोशी प्रकल्पात गेली असे २७ शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पर्यायी जमीन पुनर्वसन विभागाकडून न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त 'आम्हाला कोणी जमीन देता का जमीन' म्हणत आर्त हाक देत आहेत .

Twenty years have passed, but there is no land | वीस वर्षे लोटली तरी जमीन नाहि, केळोशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक

वीस वर्षे लोटली तरी जमीन नाहि, केळोशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक

googlenewsNext
ठळक मुद्देवीस वर्षे लोटली तरी जमीन नाहि, केळोशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड  : गेल्या वीस वर्षापूर्वी ज्या २७ कुटुंबीयांनी धरणासाठी स्वतःची शेती गावाला बहाल केली. त्या 'बैलगोंड ' ओढयावर आज लोंढा - नाला प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. किरकोळ कामे वगळता धरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सद्या काम बंद असले तरी गेल्या चार वर्षापासून या प्रकल्पात पाणी अडवून त्याचा गावकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी वापर करायला सुरवात केल्याने शेताशिवार हिरवेगार झाले आहेत. पण ज्यांची जमीन या प्रकल्पात गेली असे २७ शेतकऱ्यांना मात्र अद्यापही पर्यायी जमीन पुनर्वसन विभागाकडून न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त  'आम्हाला कोणी जमीन देता का जमीन' म्हणत आर्त हाक देत आहेत.

केळोशी बुकक (ता . राधानगरी ) येथील बैलगोंड ओढयावर १९९७-९८ मध्ये ५६०३ .२२५ घनमीटर साठवण क्षमतेचा मध्यम प्रकल्प उभारणीच्या कामास सुरवात झाली. काम दोन तीन वर्षांनी सुरू झाले. पहिल्याच टप्प्यात धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता.

आमचे पुनर्वसन प्रथम करा व मगच जमिनीचा ताबा सोडला जाईल असा हट्ट या शेतकऱ्यांनी धरला होता .पण तडजोडीने गावचे कल्याण होते व गावच्या शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटतोय म्हणून या शेतकऱ्यांनी हट्ट सोडत कसत असलेल्या जमिनी प्रशासनाच्या ताब्यात दिल्या व कामास सुरवात झाली.

या घटनेला आता जवळपास २० वर्षे लोटली. सबंधीत शेतकऱ्यांनी आम्हाला आमच्या जमिनिच्या बदल्यातल्या जमिनी देऊ करा म्हणुन या वीस वर्षात किती हेलपाटे शासन दरबारी मारले याला गणितच नाही.

गेल्या चार वर्षापासून तर या प्रकल्पातील पाणी अडवले असून अडवलेल्या पाण्याचा काठावरील व शिवारातील शेतकरी पुरेपूर वापर करत आहेत, त्यांची शेती हिरवाईने नटली आहे. पण ज्या लोकांनी हे धरण व्हावे म्हणून स्वतःची शेतीवाडी या धरणासाठी बहाल केली ते शेतकरी मात्र अद्यापही उपेक्षितच आहेत . त्यांना ना योग्य मोबदला दिला गेला, ना जमीन ! त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता आर्त टाहो फोडत आम्हाला कोणी जमीन देता का जमिन म्हणत आपले गाऱ्हाने 'लोकमत ' कडे मांडले आहे .

  • धरण परिसरात सरकारी मालकीचे ७८५ , २४,८१२ ,८२०,९०५,८८० , ८३८ इतके गट नंबर असून या गटात जवळपास ७० एकर जमीन शिल्लक असताना व शेतकऱ्यांनी या गटाचा पसंती क्रम दिला असताना प्रशासन का चालढकल करते आहे याचे उत्तर प्रशासनानेच द्यावे !
     
  •  संबंधित शेतकऱ्यांनी जमिनी देय देण्यासाठी धरणाचे काम सुरू असताना अनेक वेळा काम बंद आंदोलन केले होते. पण ठेकेदारानेही वेळ मारून नेत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे .

Web Title: Twenty years have passed, but there is no land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.