शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय कामगार गावी जाण्याच्या मार्गावर. कोल्हापूर मधील फौंड्री उद्योगा समोर नवीन संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:14 IST

लाॅकडाऊन उठल्यावर तात्काळ रेल्वे अथवा इतर गाड्या पकडन गावी या असे या कामगारांना घरचे लोक फोन करून बोलवत आहेत. कोल्हापूर मधील उद्योगात परप्रांतीय कामगारांचा आकडा २० हजारहून अधिक आहे. हे कामगार फौंड्रीत मोल्डींग,फेटलींग,रस ओतण्याचे काम,मशिनशाॅप मध्ये अवघड काम करतात आणि लाॅकडाऊन उठल्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामगार घरी गेले तर कामगार आणायचे कुठून हा प्रश्न उद्योजकांना पडला आहे.

ठळक मुद्देपण तरीही लाॅकडाऊन उठल्यावर जर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार गावी गेले तर स्थानिक ऑटोमोबाईल आणि फौंड्री उद्योग पुन्हा संकटात येणार.

-शिरोली--सतीश पाटील 

लाॅकडाऊन उठल्यावर उद्योजकांच्यावर परप्रांतीय कामगारांना थांबवण्याचे नवीन संकट उभ राहणार आहे. कोरोनाच्या भितीने जिल्ह्यातील परप्रांतीय कामगार परत गावी जाण्याच्या मार्गावर आहेत. कोरोना मुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे.भारतात ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत.

 कोल्हापूर जिल्ह्यात ऑटोमोबाईल आणि फौंड्री उद्योग मोठा आहे. शिरोली गोकुळ शिरगांव, कागल या ठिकाणच्या फौंड्री उद्योगात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. हे कामगार उत्तरप्रदेश,बिहार,कर्नाटक, पश्चिम बंगाल, उडीसा, झारखंड, मध्यप्रदेश येथील आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या कामगारांच्या घरातील लोक काळजीत पडले आहेत. लाॅकडाऊन उठल्यावर तात्काळ रेल्वे अथवा इतर गाड्या पकडन गावी या असे या कामगारांना घरचे लोक फोन करून बोलवत आहेत. कोल्हापूर मधील उद्योगात परप्रांतीय कामगारांचा आकडा २० हजारहून अधिक आहे. हे कामगार फौंड्रीत मोल्डींग,फेटलींग,रस ओतण्याचे काम,मशिनशाॅप मध्ये अवघड काम करतात आणि लाॅकडाऊन उठल्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामगार घरी गेले तर कामगार आणायचे कुठून हा प्रश्न उद्योजकांना पडला आहे.

यासाठी या कामगारांची जेवणाची, खाण्या पिण्याची, पैशांची खबरदारी उद्योजकांनी घ्यायला सुरुवात केली आहे. लागेल ती मदत देतो पण तुम्ही जाऊ नका. आपल कोल्हापूर हे चांगलं आहे. या ठिकाणी कोणताही धोका नाही तुमची काळजी आम्ही घेतो.असे सांगुन कामगरांच्या घरच्यांना ही फोन वरून समजावत आहेत. पण तरीही लाॅकडाऊन उठल्यावर जर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार गावी गेले तर स्थानिक ऑटोमोबाईल आणि फौंड्री उद्योग पुन्हा संकटात येणार.

 

लाॅकडाऊन उठल्यावर परप्रांतीय कामगार गावी गेले तर फौंड्री उद्योग अडचणीत येईल यासाठी स्मॅक आणि इतर औद्योगिक संघटनांनी या कामगारांचे प्रबोधन, मनधरणी करण्याचे ठरवले आहे.स्थानिक  कामगारांना सुद्धा सर्व सुविधा देण्याचे ठरवले आहे. (स्मॅक अध्यक्ष - अतुल पाटील)

 

परप्रांतीय कामगार कोल्हापूर मध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. हे कामगार लाॅकडाऊन उठल्यावर जर गावी गेले तर पुन्हा लवकर हे कामगार येतील का हे माहिती नाही.कामगारांची पोकळी निर्माण होईल आणि पुन्हा काम सुरू करताना उद्योगां समोर अडचणी निर्माण होतील.(फौंड्री उद्योजक-निरज झंवर)

 

स्थानिक आणि परप्रांतीय कामगारांनी लाॅकडाऊन नंतर गावी जाऊ नये. कामगार गावाला गेले तर फौंड्री उद्योग अडचणीत येईल. कामगारांनी उद्योजकांना आणि उद्योजकांनी कामगारांना समजवून घेतले पाहिजे.आणि उद्योग सुरू केले पाहिजे.(काॅ.इम्रान जंगले- जनरल सेक्रेटरी कोल्हापुर जनरल कामगार युनियन लालबवटा)

 

 

  • उद्योजकांची पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंदकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी बैठक झाली आणि उद्योजकांना लाॅकडाऊनच्या काळात बंद असलेल्या उद्योगांचे विज बिलाचे स्थीर आकार रद्द करावेत.तसेच जीएसटीसह इतर कर भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. अशी मागणी केली. या बैठकीला स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील, गोशिमा अध्यक्ष सचिन शिरगांवकर,मॅक अध्यक्ष गोरख माळी,राजू पाटील यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी