शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर वाळलेल्या उसाचे ओझे वाहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : महापुराने नदीकाठच्या ऊसशेतीचे वाळवण झाले आहे. पूर ओसरल्यानंतर तांबट रंगात माखलेला ऊस आता मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : महापुराने नदीकाठच्या ऊसशेतीचे वाळवण झाले आहे. पूर ओसरल्यानंतर तांबट रंगात माखलेला ऊस आता मात्र काळपट होऊन वाळला आहे. ऊस कुजल्याने कुबट वासाचे साम्राज्य पसरले आहे. उत्पादन नसेना वैरण तरी हाताला लागेल तेही नाही झाले तर कांड्या वाळवून जळण म्हणून वापरता येईल यासाठी उसकापणीची धांदल शिवारात पाहवयास मिळते. उसासारख्या नगदी पिकाच्या नुकसानीचे ओझं वाहण्याची वेळ महापुराने शेतकऱ्यांवर आणली आहे.

उसाच्या लागणी,खोडवी माना मुरगुळून पडल्या आहेत. अनेक ठिकाणी उंचापुरा जोमदार आलेला ऊस भुईसपाट होऊन शुद्ध हरपल्याच्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. आठ-दहा महिने राबराब राबून मशागत, खते देऊन दमदार आणलेला हिरवागार ऊस महिन्यात काळवंडलेला अन् निर्जीव झालेला ऊस पाहताना शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने भरू लागले आहेत. सोयाबीन,भुईमूग, कडधान्ये अस्तित्वहीन झाली. त्यामुळे वारणा नदीकाठचा परिसर व्यापक नुकसानीत गुरफटला आहे. यातून बळीराजा कसे कसे पुन्हा सावरून उभे राहायचे या विवंचनेत सापडला आहे.

पूर ओसल्यानंतर काही दिवसांत शेतकरी आपल्या पिकांची अवस्था पाहण्यासाठी धाडसाने शिवारात जाऊ लागले. पिकांची स्थिती किती विदारक असेल या चिंतेने जाण्याचे धाडस करीत नव्हते. पण पंचनामाच्या निमित्ताने कृषी विभागातील अधिकाऱ्यांबरोबर शेतात जाणे भाग पडले. त्यांना नुकसानीची चित्रमय स्थिती हादरवणारी वाटली. अद्यापही नदीकाठी शेतात पोहचणे मुश्कील झाले आहे.

उसाच्या सुरळीत पाणी ,गाळ गेल्याने कुजण्याची प्रक्रिया झपाट्याने झाली आहे. बगल फुटवा कुठे तरी फुटू लागला आहे. पण त्याचा उसाच्या पकवतेसाठी उपयोग नाही. काही भागातील ऊस दशी फुटून पोकळ होऊ लागला आहे. अशक्त उसाचे प्रमाणही वाढत चालले आहे.

शेतकरी मात्र जे काही हाताला लागेल तसे शेताच्या बाहेर काढू लागले आहेत. विशेष म्हणजे जो ऊस जनावरांना खाण्यायोग्य नाही तो वाळत घालून जळण म्हणून उपयोग होईल, अशी आशा बाळगू लागला आहे. जो काही ऊस थोडा फार तरला आहे. तो कारखान्याला लवकर जावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागला आहे.