शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेमध्ये गोंधळ, विकासकामांचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: November 2, 2016 00:55 IST

काही प्रकल्प ठप्पच : महत्त्वाच्या प्रकल्पांवर निर्णय नाही; कामांची गती मंदावली

 कोल्हापूर : आघाड्यांतर्गत कुरघोड्या, एकमेकांना शह देण्याचे राजकारण, काही मूठभर नगरसेवकांची दादागिरी, अधिकाऱ्यांना होत असलेली शिवीगाळ आणि कामे होत नसल्याने हतबल झालेल्या काही नगरसेवकांनी अधिकारी पैसे खात असल्याचे केलेले आरोप, त्याला आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिलेले उघड आव्हान या साऱ्या गोंधळाच्या कारभारामुळे महानगरपालिका हद्दीतील नागरी समस्या जटील बनत चालल्या आहेत. त्याचा विकासकामांवर परिणाम होऊन कामांची गती मंदावली आहे. अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि काही नवी उमेद घेऊन निवडून आलेल्या नगरसेवकांच्या उत्साहाला वर्षभरातच ओहोटी लागली आहे. पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून हेच अनुभवायला येथे आलो काय, असा प्रश्न आता अनेक होतकरी नगरसेवकांना पडला आहे. महानगरपालिकेची जी काही बदनामी व्हायची होती, ती वर्षभरात झाली. आता नवे ठेकेदार महानगरपालिकेचे काम घेतील का, अशीही भीती व्यक्त करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि ताराराणी आघाडी-भाजप असा सामना रंगला. त्यातून जिल्ह्यातील नेत्यांच्या राजकीय संघर्षाची बीजे पुन्हा एकदा रोवली गेली. त्यामुळेच महापालिका निवडणूक संपल्यानंतरही हा संघर्ष संपला नाही. सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यास कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आक्षेप घेत बऱ्याच उचापती केल्या. राजकारण : ‘सेफ सिटी’चे उद्घाटन का नाही? ४कोल्हापुरात राबविण्यात आलेला ‘सेफ सिटी’ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यातील काही त्रुटी वगळता त्याचे परिणाम चांगले दिसून येत आहेत. त्यासाठी महानगरपालिका व जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात आला आहे. ४एरवी दोन- पाच लाखांच्या विकासकामांची उद्घाटने करून त्यांचे फोटो काढले जातात; परंतु तब्बल साडेसात कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन अद्यापही झालेले नाही. ४जर कार्यक्रम करायचा ठरविले तर त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना बोलवावे लागेल, या एकाच भीतीने हा प्रकल्प उद्घाटनाशिवाय सुरू झाल्याचे नगरसेवक सांगतात. ४महानगरपालिकेच्या शाळेला प्रथमच ‘आयएसओ ९००१’ हे जागतिक दर्जाचे मानांकन मिळाले. त्याबद्दल या शाळेचा गुणगौरव करण्याचा कार्यक्रम नगरसेवकाने ठेवला होता. ४या कार्यक्रमास महापौर अश्विनी रामाणे या अनुपस्थित होत्या. ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला, ते ताराराणी आघाडीचे आहेत, या एकमेव कारणाने त्या अनुपस्थित राहिल्याची चर्चा इथे होती.