शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

"मग अजित दादांना कुठं पाठवतो?"; शाहुनगरीतून जरांगेंचा भुजबळांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 22:24 IST

मंत्री भुजबळ यांनी जालन्यातील आरक्षण बचाव एल्गार सभेत मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले.

कोल्हापूर/मुंबई - ते वेगळेच स्वप्न बघायलेत, मला तर आता असं कळालंय, मला माहिती नाही. पण, मला कळालंय. मी या व्यासपीठावरुन खोटं बोलणार नाही. ते म्हणालेत मला मुख्यमंत्री व्हायचयं, मग अजित दादांना कुठं पाठवतो, आणि देवेंद्र फडणवीसांचं. म्हणजे सगळ्यांना सोडून तुम्हालाच मुख्यमंत्री व्हायचयं. मग तर आमचा विषयचं संपला. आम्हाला आरक्षणच मिळणार नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी कोल्हापूरच्या शाहुनगरीतून भुजबळांवर जोरदार पलटवार केला. यावेळी, व्यासपीठावर कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहु महाराज आणि माजी खासदार संभाजीराजे हेही उपस्थित होते. 

मंत्री भुजबळ यांनी जालन्यातील आरक्षण बचाव एल्गार सभेत मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले. त्यांचे उपोषण आणि दौ-यांची थट्टा उडवताना पोलिस आणि ओबीसी नेत्यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल अप्रत्यक्षरित्या जरांगे-पाटील यांना जबाबदार धरले. त्यानंतर, जरांगे यांना शाहुनगरीत दोन्ही राजेंच्या उपस्थितीत छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. 

वयाच्या मानाने ते आज काहीही बरळले, मी सासऱ्याच्या घरचं खातो, असेही म्हटले. पण, तू तर आमचं खातो, आम्हा गरीब जनतेचं रक्त पिऊन तुम्ही मोठे झालात. त्यांना राज्यात अशांतता पसरवायची आहे, त्यांना गोंधळ निर्माण करायचा आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांना रोखावं, नाहीतर आम्ही जशास तसं उत्तर देऊ, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला. यावेळी, दोन्ही राजेंनी टाळ्या वाजवून दाद दिली. 

म्हणूनच तुरुंगात जाऊन बेसन भाकरी खाल्ली

'व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल आदर होता. मात्र, एवढ्या मोठ्या माणसाने आज पातळी सोडली. आम्ही आमच्या कष्टाचे खातो. घाम गाळतो. एक दिवसाच्या जेवणासाठी पैसे नव्हते, अशी तुमची परिस्थिती होती. आज तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आली कोठून? तुम्ही गोचिडासारखे आमच्या जनतेचे रक्त शोषूण करोडोची संपत्ती कमवली. म्हणूनच तुम्हाला जेलमध्ये जाऊन बेसन-भाकरी खावी लागली. गोरगरिबांचा तळतळाट तुम्हाला स्वस्थ घरात बसू देत नव्हता. त्यामुळेच तुम्ही तुरुंगात गेला. जे सत्य आहे ते बोललेच पाहिजे.'

त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे...

मंत्री भुजबळ यांना मुख्यमंत्री बनण्याचे डोहाळे लागल्याचा गौप्यस्फोट जरांगे-पाटील यांनी केला. त्यांना मुख्यमंत्री बनायचे आहे. तीच इच्छा त्यांच्या ओठावर आली. पण, ते खुप अवघड आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे काय होणार? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलkolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ