शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कुंभी नदीच्या पाण्याला काळसर रंग, नदीकाठच्या अकरा गावांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 1:57 PM

कुंभी नदीवर सांगरूळ-कुडित्रे दरम्यान असलेल्या सांगरूळ धरण संस्थेचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला नोव्हेंबरमध्ये पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. यामुळे पाणी प्रवाहित होत नाही.

प्रकाश पाटील

कोपार्डे : कुंभी नदीतील पाण्याला काळपट, तांबूस रंग आला आहे. याच नदीतून काठावरील ११ गावांतील ग्रामस्थांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजना असल्याने हे पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

कुंभी नदीवर सांगरूळ-कुडित्रे दरम्यान असलेल्या सांगरूळ धरण संस्थेचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला नोव्हेंबरमध्ये पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. यामुळे पाणी प्रवाहित होत नाही. याशिवाय वळवाचापाऊस पडत असल्याने पावसाचे पाणी ओढ्यानाल्याने थेट नदीला मिळत आहे. यातून वाहत जाणारे गावागावांतील सांडपाणी थेट नदीला मिसळत आहे.

पावसाच्या हजेरीने शेतीपंप बंद असल्याने नदीच्या पाण्याचा उपसा होत नाही. बंधाऱ्यातील पाणी प्रवाहित करण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष देऊन नागरिकांना याबाबत पाणी उकळून पिण्यासाठी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा साथीच्या आजारांना सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाणी फिल्टरची योजना नाही

ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांना फिल्टर नाही. अनेक ग्रामपंचायती नदीतून पाणी उपसा करून ते पाण्याच्या टाकीत टाकतात व पाणी फिल्टर करण्याची योजना नसल्याने थेट आहे तसा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असून यातून साथीचे रोग पसरत आहेत.

पावडर वापरण्याचे ज्ञान नाही

पाण्याचे प्रदूषित प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामपंचायती टी सेल पावडरीचा हमखास वापर करतात; पण ती वापरण्याचे ज्ञान, कौशल्य कर्मचाऱ्यांना नसल्याने प्रमाणापेक्षा जास्त पावडरीचा वापर होतो. टी सेल पावडरीच्या अतिवापराने आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांगरूळ बंधाऱ्यात अडविण्यात आलेले पाणी वाहते करण्यासाठी आरोग्य विभागाने सूचना कराव्यात; अन्यथा साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. - भगवान देसाई, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, भामटे 

 कारणे शोधण्याचे शासकीय पातळीवर कोणतेच प्रयत्न होत नाहीत. गेल्या चार-आठ दिवसांपासून नदीतील अशुद्ध पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या पातळीवर याबाबत खबरदारी घ्यावी. - दिनेश पाटील, कोपार्डे ग्रामस्थ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण