शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

निर्यात बंदी उठली; आता कसोटी कारखान्यांची!, दर कमी तरी शेतकरी ऊस कर्नाटकात पाठवतोच का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 17:03 IST

शेतकऱ्यांचे हित कशात?

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : ऊस उत्पादकांशी संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील ऊस परराज्यात पाठवण्यावर घातलेली बंदी आठ दिवसांतच मागे घेतली आहे. मुळात कर्नाटकात ऊस दर महाराष्ट्रापेक्षा १५० ते २०० रुपये कमी मिळत असताना राज्यातील शेतकऱ्यांवर तिकडे ऊस पाठविण्याची वेळ का येते? शेतकरी हित हेच आमचे अंतिम लक्ष्य असे सरकार आणि कारखानदार दोघेही म्हणत असले तरी त्यांचे ‘खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’ अशी भावना ऊस उत्पादकांची का झाली आहे. यावर राज्य सरकारबरोबरच कारखानदारांनीही विचार करणे गरजेचे आहे.कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने यांच्यासाठी येत्या हंगामात याचे बरेवाईट परिणाम होणार आहेत. गाळपासाठी स्पर्धा निर्माण होऊन उसाला जादा दर देणारे कारखानेच जास्तीत जास्त उसाचे गाळप करू शकतील. जे यात कमी पडतील. त्यांचे पाय आर्थिकदृष्ट्या खोलात जातील.

चांगला दर देण्याबरोबरच लवकर तोड देणाऱ्या कारखान्याला ऊस गेल्यास शेतकऱ्यांना पुढील पीक घेणे सोयीचे होईल. किमान पक्षी वेळेत ऊस गेल्याचे आणि दोन पैसे पदरात पडल्याचे समाधान त्याला लाभेल. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ६ कारखाने बहुराज्य नोंदणी असणारे आहेत. कर्नाटकातही हिरण्यकेशीसह काही कारखाने बहुराज्य आहेत. हे कारखाने दोन्ही राज्यांतील ऊस गाळपासाठी आणू शकतात. संकट शेतकरी आणि कारखाने दोघांवरही आहे. त्यामुळे अडचणीत येणाऱ्यांना सरकारनेच मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

बंदी का घातली?

  • यंदा महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही दुष्काळाची छाया गडद आहे. साहजिकच यामुळे या दोन्ही राज्यांत उसाखालील क्षेत्र दरवर्षीपेक्षा कमी आहे. ऊसही म्हणावा तसा पोसावलेला नाही यामुळे यंदा उसाबरोबरच साखरेचे उत्पादनही कमी येण्याचा अंदाज आहे.
  • महाराष्ट्रात चालू हंगामात १०५० लाख टन ऊस उपलब्ध होता. येत्या हंगामासाठी तो ९५० लाख टन उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांची गाळपक्षमता लक्षात घेता १३०० लाख टन उसाचे गाळप कारखाने करू शकतात. यामुळे यंदा हगाम जास्तीत जास्त ९० दिवसच चालेल, असा अंदाज आहे.
  • कमी कालावधीचा हंगाम असल्याने उत्पादन खर्च वाढतो. हंगाम यशस्वी व्हायचा असेल तर तो किमान १२० दिवसांचा तरी हवा अन्यथा आर्थिकदृष्ट्या हंगाम परवडत नाही, असे कारखानदारांचे म्हणणे आहे. यामुळेच राज्यातील ऊस परराज्यात पाठवण्यावर बंदी घालण्याची मागणी कारखानदारांनी केली होती. ती मान्य करत राज्य सरकारनेही ऊस निर्यातबंदी लागू केली होती.

शेतकऱ्यांचे हित कशात?

  • यंदा पाऊस कमी आहे. विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. नदीत भरपूर पाणी असले तरी वीज नसल्याने उभ्या उसाला वेळेवर पाणी देता येत नाही. पाऊस आणखी लांबल्यास पीक वाळून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे ऊस जास्तीत जास्त लवकर कारखान्याला जाणे आवश्यक आहे.
  • उसाची निर्यातबंदी झाल्यास कारखाने आपल्या उसाला लवकर तोड देणार नाहीत. परिणामी, पुढील पीक घेता येणार नाही. उसाचे वजन कमी होऊन आर्थिक नुकसानही होईल. त्यामुळे निर्यातबंदी चुकीची आहे. चांगला दर देणाऱ्या आणि लवकर तोड देण्याऱ्या कारखान्याला आम्ही ऊस घालू, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
  • कारखाने टिकले तरच ऊस उत्पादक टिकेल हे मान्य असले तरी ऊस अतिरिक्त होतो त्यावेळी तो लवकर नेला जात नाही. शेतात शिल्लक राहणाऱ्या उसाला का अनुदान दिले जात नाही, चांगला दर मिळावा यासाठी कारखान्यांमध्ये निकोप स्पर्धा होऊ द्यावी. शेतकऱ्याला योग्य वाटेल त्या कारखान्याला मग तो महाराष्ट्रातील असो की परराज्यातील. कारखान्यांना हंगाम परवडत नसेल तर त्यांना शासनाने मदत करावी, अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका आहे.

 

शेतकरी स्वतःचा माल कुठंही विकायला स्वतंत्र आहे. जो कारखाना चांगला दर देईल. त्यालाच  तो ऊस घालेल. - राजू पोवार, कार्याध्यक्ष, कर्नाटक राज्य रयत संघटना

ऊस निर्यातबंदी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी होती. आता ती उठली असल्याने चांगला दर आणि वेळेत तोड देणाऱ्या कारखान्यालाच शेतकरी ऊस पाठवतील. - राजेंद्र गड्ड्यान्नवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी