शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना गळती, अकॅडमीमध्ये भरती; कोल्हापूर जिल्ह्यात १११ हून अधिक अकॅडमी, शाळांवर परिणाम

By समीर देशपांडे | Updated: August 5, 2025 12:49 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ शाळांची तपासणी

समीर देशपांडे कोल्हापूर : एकीकडे प्राथमिक आणि माध्यमिक शासनमान्य शाळांमधील शिक्षकांना उत्तम वेतन दिले जात असताना दुसरीकडे पालकांचा ओढा मात्र अकॅडमीकडे वाढत असल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात अंदाजे १११ हून अधिक अकॅडमी सुरू असून, याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांवर आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांवरही होत आहे.गेल्या दहा वर्षांमध्ये अकॅडमीचे प्रस्थ वाढत असल्याचे दिसून येत आहे. याआधीची परिस्थिती नीट होती. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये चौथीपर्यंत शिक्षण, त्यानंतर गावातील किंवा पंचक्रोशीतील पाचवी ते दहावी, बारावी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात पुढचे शिक्षण. त्यानंतर मग ज्यांना शक्य ते अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर पडायचे. काही जण कोल्हापुरातील महाविद्यालयात शिकायला यायचे, तर उरलेले जवळच्या दहा, बारा किलोमीटरच्या महाविद्यालयात कला, विज्ञान, वाणिज्यच्या पदवीसाठी अध्ययन करायचे.परंतु, परिस्थिती बदलत गेली. इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व घरोघरी पोहोचले. पूर्वी मोजक्या इंग्रजी शाळा होत्या. परंतु, ही भाषा मुलांना आली तरच त्यांचे भवितव्य घडेल असे वातावरण तयार झाल्याने साहजिकच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे ओढा वाढू लागला. त्याही पुढे जात आता मुलांना इंग्रजी आले पाहिजे, स्पर्धा परीक्षेसाठी त्याची तयारी झाली पाहिजे, इतर कला आणि क्रीडा प्रकारांमध्येही तो अव्वल झाला पाहिजे यासाठी अकॅडमीचा पर्याय पुढे आला आणि तो आता बाळसेही धरू लागला आहे.

डीएड, बीएड. झाल्यानंतरही नोकरी न लागलेल्या अनेकांनी अशा अकॅडमी सुरू केल्या असून, त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. एकीकडे मोफत शिक्षण मिळत असून, तिकडे पाठ करून वर्षाला ५० हजारांपासून दीड लाखापर्यंत खर्च असणाऱ्या अकॅडमीमध्ये मात्र मुलांना प्रवेश मिळावा यासाठी पालक धडपड करताना दिसत आहेत.

काहींनी घेतली परवानगीकाही प्रथितयश अकॅडमींनी कायदेशीरदृष्ट्या शिक्षण खात्याची परवानगी घेऊन आपल्या अकॅडमी किंवा शाळा सुरू केल्या आहेत. परंतु, बहुतांशी अकॅडमींनी कुठेही नोंदणी न करताच आपला कार्यभार सुरू केला आहे. गावाबाहेर चार, पाच एकर जागा, इमारत, क्रीडांगण, बसेस घेऊन कामकाजही सुरू केले आहे.

आतापर्यंत ३२ शाळांची तपासणीजिल्ह्यात अकॅडमींची संख्या भरमसाट पद्धतीने वाढत असल्याने आता माध्यमिक शाळांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांहून विद्यार्थी कोणत्याही सबळ कारणाशिवाय गैरहजर आहेत, अशा शाळांना नोटिसा काढण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ शाळांची तपासणी झाली आहे. शहरातील प्रतिभानगर येथील क्रांतिज्याेती हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना नोटीस काढण्यात आली आहे. या ठिकाणी बहुतांशी विद्यार्थी गैरहजर होते. तेव्हा त्र्यंबोली यात्रेमुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने गैरहजर असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या किंवा शासनमान्य शाळेत विद्यार्थ्याचे नाव आणि प्रत्यक्षात विद्यार्थी अकॅडमीमध्ये असे सर्रास चित्र जिल्ह्यात दिसत असून, याबाबत शिक्षण विभाग काहीही कारवाई करत नाही. खोटी हजेरी लावणाऱ्यांचीही चौकशी व्हावी. शिक्षण विभागाशी संबंधितांच्या किती अकॅडमी आहेत याचीही चौकशी होण्याची गरज आहे. - रूपेश पाटील, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड