शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

सरकारच्या भंपकबाजीमुळे वस्त्रोद्योग देशोधडीला: प्रकाश आवाडे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 1:05 AM

इचलकरंजी : केंद्र व राज्य सरकार पोकळ घोषणाबाजी करण्यातच धन्यता मानत आहे. पाच टक्के व्याज दराची सवलत ही केवळ ...

इचलकरंजी : केंद्र व राज्य सरकार पोकळ घोषणाबाजी करण्यातच धन्यता मानत आहे. पाच टक्के व्याज दराची सवलत ही केवळ नव्या यंत्रमागांसाठीच आहे. त्यामुळे या योजनेसाठी आजवर केलेल्या अर्जदारांना याचा काहीच लाभ मिळणार नाही. सरकारची निष्क्रियता झाकण्यासाठी चुकीच्या माहितीद्वारे दिशाभूल केली जात आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा भंपकबाजी करीत असल्याने यंत्रमाग उद्योगाची वाट लागली आहे, अशी टीका माजी मंत्री वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.केंद्र आणि राज्य सरकार हे केवळ घोषणांची वल्गना करणारे असल्यामुळे अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगातील एकाही घटकाला कोणतीही मदत मिळालेली नाही, असा आरोप करून माजी मंत्री आवाडे म्हणाले, वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनाला दोन वर्षे लोटली, तरी त्यापैकी एकही योजना कार्यान्वित झाली नाही. नकारात्मक धोरणांमुळे उद्योगाची वाट लागली आहे.कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात टफ्स ही ३० टक्के अनुदानाची सवलत भाजप सरकारने दहा टक्क्यांवर आणली. मात्र, अद्यापही तिचा लाभ मिळालेला नाही. वीज बिल सवलतीचा तर खेळखंडोबा केला आहे. कामगार कल्याण मंडळाची स्वतंत्र स्थापना करण्याऐवजी या मंडळात १२३ घटकांचा समावेश करून कामगारांचा विश्वासघात केला आहे, असाही आरोप माजी मंत्री आवाडे यांनी केला. पत्रकार परिषदेवेळी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, सुनील पाटील, विलास गाताडे, सतीश कोष्टी, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते.यंत्रमागधारकांना लवकरच व्याज सवलतइचलकरंजी : यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जावर पाच टक्के व्याजाची सवलत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे व्याज सवलतीचे प्रस्ताव सादर केलेल्या यंत्रमागधारकांना लवकरच सवलत मिळेल, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. यंत्रमागधारकांनी विविध बॅँकांकडून घेतलेल्या कर्जावर पाच टक्के व्याज सवलत पुढील पाच वर्षांसाठी द्यावयाची आहे. यातील त्रुटी दूर करून यंत्रमागधारकांनी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांना व्याज सवलत जाहीर केली आहे. वस्त्रोद्योग उपसंचालकांनी चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, त्यांनी यंत्रमाग कर्जाचे प्रस्ताव जमा केले व ते आता मुंबई येथे पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच ही सवलत मिळेल.