शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तेरवाडमध्ये पंचगंगा पात्राला जलपर्णीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:26 AM

कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे दूषित पाण्याबरोबर जलपर्णीचे संकट निर्माण होत असल्याने जलपर्णी हटविण्यासाठी ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे दूषित पाण्याबरोबर जलपर्णीचे संकट निर्माण होत असल्याने जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच नियोजन करून नदीपात्राला जलपर्णीमुक्त करणे गरजेचे आहे.

दरम्यान, पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधा-याला तुंबलेली जलपर्णी पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांडुरंग पाटील यांनी रविवारी दुपारी मच्छीमारी करणा-या बागडी समाजाच्या लोकांच्या मदतीने बंधा-याचे बरगे काढून पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी हटविली. मात्र जलपर्णी नदीपात्रात पुढे ढकलल्याने शिरोळ अथवा कृष्णा नदीवरील राजापूर बंधा-यावर संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे जलपर्णी जेसीबीच्या साहाय्याने पात्राबाहेर काढण्यात यावी, अशी मागणी नदी प्रदूषणविरोधी चळवळीचे कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी केले आहे. पंचगंगा नदी पाणी प्रदूषणाबरोबर जलपर्णीचे संकट प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात तीव्रतेने जाणवते. गतवर्षी उन्हाळ्यात कोरोना संसर्गामुळे औद्योगिक कारखाने बंद असल्याने नदी ब-याच अंशी प्रदूषणमुक्त झाली होती. परिणामी स्वच्छ पाण्यामुळे जलपर्णीही निर्माण झाली नव्हती.

गेल्या दोन महिन्यापासून औद्योगिक कारखाने पूर्ववत सुरू झाल्याने औद्योगिक कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्याने नदी प्रदूषण पुन्हा गंभीर बनली आहे.

प्रदूषित पाण्यावर हिवाळ्यात जलपर्णी उगवते. उन्हाळ्यात उग्ररूप धारण करून नदीपात्रात सुमारे तीन ते चार फूट जाडीचा थर घट्ट विणल्यामुळे पाण्याला सूर्यप्रकाश न मिळाल्याने जलचर प्राण्याबरोबर पाणी स्वच्छ करणारे मासेही मृत्युमुखी पडतात. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नदी प्रदूषण करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने काही अंशी पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असले तरी अद्याप बाल्यावस्थेत असलेली जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालण्याची मागणी पंचगंगाकाठच्या नागरिकांतून होत आहे.

फोटो - २४०१२०२१-जेएवाय-०१, ०२ फोटो ओळ - ०१) पंचगंगा नदीवरील तेरवाड (ता. शिरोळ) बंधारा परिसरात नदीपात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. ०२) पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी मच्छीमारी करणा-या बागडी समाजाच्या सहकार्याने पात्रातील जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाबरोबर ढकलण्यात येत आहे.