शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तेरवाडमध्ये पंचगंगा पात्राला जलपर्णीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST

कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे दूषित पाण्याबरोबर जलपर्णीचे संकट निर्माण होत असल्याने जलपर्णी हटविण्यासाठी ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे दूषित पाण्याबरोबर जलपर्णीचे संकट निर्माण होत असल्याने जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच नियोजन करून नदीपात्राला जलपर्णीमुक्त करणे गरजेचे आहे.

दरम्यान, पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधा-याला तुंबलेली जलपर्णी पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांडुरंग पाटील यांनी रविवारी दुपारी मच्छीमारी करणा-या बागडी समाजाच्या लोकांच्या मदतीने बंधा-याचे बरगे काढून पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी हटविली. मात्र जलपर्णी नदीपात्रात पुढे ढकलल्याने शिरोळ अथवा कृष्णा नदीवरील राजापूर बंधा-यावर संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे जलपर्णी जेसीबीच्या साहाय्याने पात्राबाहेर काढण्यात यावी, अशी मागणी नदी प्रदूषणविरोधी चळवळीचे कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी केले आहे. पंचगंगा नदी पाणी प्रदूषणाबरोबर जलपर्णीचे संकट प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात तीव्रतेने जाणवते. गतवर्षी उन्हाळ्यात कोरोना संसर्गामुळे औद्योगिक कारखाने बंद असल्याने नदी ब-याच अंशी प्रदूषणमुक्त झाली होती. परिणामी स्वच्छ पाण्यामुळे जलपर्णीही निर्माण झाली नव्हती.

गेल्या दोन महिन्यापासून औद्योगिक कारखाने पूर्ववत सुरू झाल्याने औद्योगिक कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्याने नदी प्रदूषण पुन्हा गंभीर बनली आहे.

प्रदूषित पाण्यावर हिवाळ्यात जलपर्णी उगवते. उन्हाळ्यात उग्ररूप धारण करून नदीपात्रात सुमारे तीन ते चार फूट जाडीचा थर घट्ट विणल्यामुळे पाण्याला सूर्यप्रकाश न मिळाल्याने जलचर प्राण्याबरोबर पाणी स्वच्छ करणारे मासेही मृत्युमुखी पडतात. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नदी प्रदूषण करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने काही अंशी पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असले तरी अद्याप बाल्यावस्थेत असलेली जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालण्याची मागणी पंचगंगाकाठच्या नागरिकांतून होत आहे.

फोटो - २४०१२०२१-जेएवाय-०१, ०२ फोटो ओळ - ०१) पंचगंगा नदीवरील तेरवाड (ता. शिरोळ) बंधारा परिसरात नदीपात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. ०२) पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी मच्छीमारी करणा-या बागडी समाजाच्या सहकार्याने पात्रातील जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाबरोबर ढकलण्यात येत आहे.