कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी क्षेत्र काशी, वाराणशी येथे निर्माण केलेला मणिकर्निका घाट उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मल्हार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आली.अहिल्यादेवींनी देशभरात हजारो मंदिरांचा जीर्णोध्दार स्वत: केला. बारा जोतिर्लिंगांचा जीर्णोध्दार करून तिथे घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, अन्नक्षेत्रे उभी केली. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याऐवजी बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला जात आहे. या घटनेचा निषेध करताना इतिहास पुसण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. उत्तर प्रदेश सरकारने हा घाट पूर्ववत बांधाच, परंतु अहिल्यादेवींची, गंगा मातेची प्रतिम असलेली मणी पूर्ववत उभारावी, अशी मागणी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी केली.यावेळी, मेघना गावडे, बाबुराव बोडके, रुपेश आडूळकर, सागर बोंडेकर, कोंडिबा आडूळकर, रेजाश बाणदार, संकेत वाडकर आदी उपस्थित होते.
Web Summary : Malhar Sena demands action against those who demolished the Manikarnika Ghat, built by Ahilyadevi Holkar in Kashi. They protested the destruction of historical heritage, urging the Uttar Pradesh government to rebuild the ghat and restore Ahilyadevi's idol.
Web Summary : मल्हार सेना ने काशी में अहिल्यादेवी होल्कर द्वारा निर्मित मणिकर्णिका घाट को ध्वस्त करने वालों के खिलाफ कार्रवाई की मांग की। उन्होंने ऐतिहासिक धरोहर के विनाश का विरोध किया और उत्तर प्रदेश सरकार से घाट के पुनर्निर्माण और अहिल्यादेवी की मूर्ति को बहाल करने का आग्रह किया।