शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

जिल्ह्यात स्वाईन फ्लूची लागण -: पाच महिन्यांत ११५ संशयित, तर ४७ स्वाईनबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:58 IST

आरोग्यासाठी अत्यंत सुदृढ वातावरण असलेल्या कोल्हापूरला स्वाईन फ्लूचा विळखा पडत आहे. मागील वर्षापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ अद्याप थांबलेली नाही. जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये २९ जणांचा जीव स्वाईनने घेतला. गेल्या पाच महिन्यांत ११५ रुग्ण संशयित म्हणून दाखल झाले. यातील ४७ जणांना स्वाईनची लागण झाली.

ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढ

संतोष पाटील ।कोल्हापूर : आरोग्यासाठी अत्यंत सुदृढ वातावरण असलेल्या कोल्हापूरलास्वाईन फ्लूचा विळखा पडत आहे. मागील वर्षापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ अद्याप थांबलेली नाही. जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये २९ जणांचा जीव स्वाईनने घेतला. गेल्या पाच महिन्यांत ११५ रुग्ण संशयित म्हणून दाखल झाले. यातील ४७ जणांना स्वाईनची लागण झाली.

११८ विविध प्रकारच्या एच१ एन१ व्हायरसमुळे होणाऱ्या स्वाईनने कोल्हापुरातील वातावरणाशी जुळवून घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पर्यटनाच्या निमित्ताने होणारी कोल्हापुरातील गर्दी हे स्वाईन संसर्गाचे प्रमुख कारण आहे.मागील वर्षी जिल्ह्यात १२७ रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह होते. त्यापैकी शहरात ३७ व ग्रामीण भागातील ९० रुग्ण होते. त्यापैकी शहरातील स्वाईन फ्लूचे २४ रुग्ण बरे झाले, तर नऊ रुग्ण मयत झाले. तसेच ग्रामीण भागातील ३९ रुग्णांपैकी २० रुग्ण मरण पावले होते. खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांची संख्या याच्या दुप्पट आहे. सर्दी, खोकला, ताप ही सामान्य आजारांची लक्षणेच स्वाईनची असू शकतात; त्यामुळे काळजी घेणे, प्रतिबंधक उपाय योजने हेच यावर औषध आहे.

ज्यांना श्वसनाचा आधीपासूनच त्रास आहे, दमा अशांना रिलेंझा हे औषध देता येत नाही; कारण यामुळे श्वसनाच्या अधिक समस्या उद्भवू शकतात.स्वाईन फ्लूवर औषधोपचार कोणते ?टॉमी फ्लू किंवा रिलेंझा ही औषधे स्वाईन फ्लूवर उपचार म्हणून दिली जातात. लक्षणे दिसण्याच्या ४८ तासांच्या आत ही औषधे घ्यावी लागतात. ही औषधे योग्य वेळेवर घेतल्यास फ्लूचा कालावधी १ ते २ दिवसांनी कमी करता येतो. ही औषधे ५ ते ७ दिवसांसाठी दिली जातात. स्वाईन फ्लूवर प्रतिबंधात्मक लस निघाली आहे. ती नाकाद्वारे किंवा टोचून घेता येते. या प्रतिबंधात्मक औषधांमुळे उदासीनता, धडधड वाढणे, भीती वाटणे, एकाग्रता कमी होणे व उलट्या होणे यांसारखे प्रादुर्भाव होऊ शकतात.शिंकताना नाकातोंडावर रुमाल ठेवणे.आजारी व्यक्तीच्या संपर्कात राहू नये.फ्लूसारखी लक्षणे दिसू लागल्यावर सात दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा जेणेकरून संसर्ग टळेल.हात साबण व स्वच्छ पाण्याने नियमित धुवा.डोळ्यांना, नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे.गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा.ज्यांना श्वसनाचे आजार आहेत, त्यांच्याशी संपर्क टाळा.भरपूर झोप आणि पौष्टिक आहार घ्या.घरातील हवा मोकळी राहील, याचीदक्षता घ्यावी.आरोग्यदायी सवयींचे कटाक्षाने पालन करावे.जर आपण गेल्या १0 दिवसांत प्रादुर्भाव असलेल्या भागातून प्रवास केला असेल व स्वाईन फ्लूची लक्षणे दिसत असतील, तर दवाखान्यांशी संपर्क साधावा. घाबरून जाऊ नका. - डॉ. साईप्रसाद‘स्वाईन’मुळे काय होते?१ फुफ्फुसाचे विकार२ तीव्र हृदयविकार३ तीव्र मूत्रपिंडाचे विकार४ तीव्र यकृताचे विकार५ तीव्र न्युरोलोजिकल विकार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwine Flueस्वाईन फ्लू