शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यात स्वाईन फ्लूची लागण -: पाच महिन्यांत ११५ संशयित, तर ४७ स्वाईनबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:58 IST

आरोग्यासाठी अत्यंत सुदृढ वातावरण असलेल्या कोल्हापूरला स्वाईन फ्लूचा विळखा पडत आहे. मागील वर्षापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ अद्याप थांबलेली नाही. जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये २९ जणांचा जीव स्वाईनने घेतला. गेल्या पाच महिन्यांत ११५ रुग्ण संशयित म्हणून दाखल झाले. यातील ४७ जणांना स्वाईनची लागण झाली.

ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढ

संतोष पाटील ।कोल्हापूर : आरोग्यासाठी अत्यंत सुदृढ वातावरण असलेल्या कोल्हापूरलास्वाईन फ्लूचा विळखा पडत आहे. मागील वर्षापासून सुरू झालेली स्वाईन फ्लूची साथ अद्याप थांबलेली नाही. जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये २९ जणांचा जीव स्वाईनने घेतला. गेल्या पाच महिन्यांत ११५ रुग्ण संशयित म्हणून दाखल झाले. यातील ४७ जणांना स्वाईनची लागण झाली.

११८ विविध प्रकारच्या एच१ एन१ व्हायरसमुळे होणाऱ्या स्वाईनने कोल्हापुरातील वातावरणाशी जुळवून घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पर्यटनाच्या निमित्ताने होणारी कोल्हापुरातील गर्दी हे स्वाईन संसर्गाचे प्रमुख कारण आहे.मागील वर्षी जिल्ह्यात १२७ रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह होते. त्यापैकी शहरात ३७ व ग्रामीण भागातील ९० रुग्ण होते. त्यापैकी शहरातील स्वाईन फ्लूचे २४ रुग्ण बरे झाले, तर नऊ रुग्ण मयत झाले. तसेच ग्रामीण भागातील ३९ रुग्णांपैकी २० रुग्ण मरण पावले होते. खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांची संख्या याच्या दुप्पट आहे. सर्दी, खोकला, ताप ही सामान्य आजारांची लक्षणेच स्वाईनची असू शकतात; त्यामुळे काळजी घेणे, प्रतिबंधक उपाय योजने हेच यावर औषध आहे.

ज्यांना श्वसनाचा आधीपासूनच त्रास आहे, दमा अशांना रिलेंझा हे औषध देता येत नाही; कारण यामुळे श्वसनाच्या अधिक समस्या उद्भवू शकतात.स्वाईन फ्लूवर औषधोपचार कोणते ?टॉमी फ्लू किंवा रिलेंझा ही औषधे स्वाईन फ्लूवर उपचार म्हणून दिली जातात. लक्षणे दिसण्याच्या ४८ तासांच्या आत ही औषधे घ्यावी लागतात. ही औषधे योग्य वेळेवर घेतल्यास फ्लूचा कालावधी १ ते २ दिवसांनी कमी करता येतो. ही औषधे ५ ते ७ दिवसांसाठी दिली जातात. स्वाईन फ्लूवर प्रतिबंधात्मक लस निघाली आहे. ती नाकाद्वारे किंवा टोचून घेता येते. या प्रतिबंधात्मक औषधांमुळे उदासीनता, धडधड वाढणे, भीती वाटणे, एकाग्रता कमी होणे व उलट्या होणे यांसारखे प्रादुर्भाव होऊ शकतात.शिंकताना नाकातोंडावर रुमाल ठेवणे.आजारी व्यक्तीच्या संपर्कात राहू नये.फ्लूसारखी लक्षणे दिसू लागल्यावर सात दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा जेणेकरून संसर्ग टळेल.हात साबण व स्वच्छ पाण्याने नियमित धुवा.डोळ्यांना, नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे.गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा.ज्यांना श्वसनाचे आजार आहेत, त्यांच्याशी संपर्क टाळा.भरपूर झोप आणि पौष्टिक आहार घ्या.घरातील हवा मोकळी राहील, याचीदक्षता घ्यावी.आरोग्यदायी सवयींचे कटाक्षाने पालन करावे.जर आपण गेल्या १0 दिवसांत प्रादुर्भाव असलेल्या भागातून प्रवास केला असेल व स्वाईन फ्लूची लक्षणे दिसत असतील, तर दवाखान्यांशी संपर्क साधावा. घाबरून जाऊ नका. - डॉ. साईप्रसाद‘स्वाईन’मुळे काय होते?१ फुफ्फुसाचे विकार२ तीव्र हृदयविकार३ तीव्र मूत्रपिंडाचे विकार४ तीव्र यकृताचे विकार५ तीव्र न्युरोलोजिकल विकार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwine Flueस्वाईन फ्लू