शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीदेखील केंद्राची नवी चालच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST

गडहिंग्लज : केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात नवीन शेती धोरणावरून निर्माण झालेल्या संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, हे चांगलेच ...

गडहिंग्लज : केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात नवीन शेती धोरणावरून निर्माण झालेल्या संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, हे चांगलेच झाले; परंतु न्यायालयाची स्थगितीदेखील केंद्राची नवी चालच आहे, असे परखड मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांनी व्यक्त केले.

समाजवादी प्रबोधिनी आणि येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजन पेडणेकर होते. प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण’ हा चर्चासत्राचा विषय होता.

पाटील म्हणाले, भांडवलदारांना अनिर्बंध स्वातंत्र्य आणि शेतकरी व बाजार समित्यांना संकटात ढकलण्याचे काम केंद्र सरकार नव्या कायद्यातून करत आहे. त्याचा हेतू एक, भाषा एक आणि अर्थमात्र भांडवलशाहीचाच आहे. त्यामागे शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचे कारस्थानच आहे.

कुलकर्णी म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेला, सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना वाढत्या भांडवलशाहीचा धोका आहे. त्यातून देशाची अखंडताही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे भांडवलीकरणाला वेळीच पायबंद घालायला हवा.

यावेळी प्राचार्य सुरेश चव्हाण, शिवाजीराव होडगे, उज्ज्वला दळवी यांच्यासह गडहिंग्लज परिसरातील शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. काशीनाथ तनंगे यांनी प्रास्ताविक केले. संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. धर्मवीर क्षीरसागर यांनी आभार मानले.

--------------------------------------------------

* आभासी जगाचे षड्‌यंत्र

अन्न आणि वस्त्र हाच जगातील सर्वांत मोठा व्यापार आहे. म्हणूनच तो भांडवलदारांना आपल्याकडे हवा आहे. त्यासाठी जीवनाश्यक वस्तूंचा कायदा रद्द करण्याचा घाट भांडलवदारांनी घातला आहे. त्यासाठी तथाकथित विद्वानांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या हिताचे भासवणारे आभासी जग निर्माण करण्याचे षड्‌यंत्र पद्धतशीरपणे सुरू आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

--------------------------------------------------

* ‘त्या’ अहवालाविषयी शंका!

आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यांची समिती नेमली आहे; परंतु केंद्राच्या नव्या कायद्यांचे समर्थन करणाऱ्यांचाच समितीत समावेश आहे. त्यातून केंद्राला हवा तसा निर्णय होण्याचा धोका आहे. म्हणूनच समितीच्या अहवालाबाबतही शेतकऱ्यांना शंका आहे, असेही पाटील म्हणाले.

--------------------------------------------------

फोटो ओळी :

गडहिंग्लज येथील चर्चासत्रात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश चव्हाण, प्रसाद कुलकर्णी, राजन पेडणेकर, शिवाजीराव होडगे, उज्ज्वला दळवी आदींची उपस्थिती होती.

क्रमांक : १३०१२०२१-गड-०८