शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचा विषय हवा : श्रीपाल ओसवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:25 AM

देशात वर्षाला सरासरी पाच लाख अपघात होतात. त्यातील सुमारे दीड लाख लोक मरण पावतात. म्हणजेच दिवसाला ४००, तर तासाला १७ लोक अपघातात ठार होतात. अन्य सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूमध्ये

ठळक मुद्देरस्ते अपघात रोखण्यासाठी गांभीर्याने पाहण्याची गरज

इचलकरंजी : देशात वर्षाला सरासरी पाच लाख अपघात होतात. त्यातील सुमारे दीड लाख लोक मरण पावतात. म्हणजेच दिवसाला ४००, तर तासाला १७ लोक अपघातात ठार होतात. अन्य सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूमध्ये सर्वाधिक तरुण अपघातात ठार होतात. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, सर्वांनीच स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमात वाहतुकीच्या नियमांबाबतचा विषय आवश्यक आहे, असे मत श्रीपाल ओसवाल (कºहाड) यांनी व्यक्त केले.

येथील घोरपडे नाट्यगृहात आयोजित वाहतुकीचे नियम व चालकांच्या चुकामुळे होणारे अपघात याविषयी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ओसवाल यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करीत अनेक महत्त्वाचे मुद्दे आकडेवारीसह स्पष्ट केले. त्यामध्ये देशातील होणाºया अपघातात पादचारी, सायकलस्वार व मोटारसायकलस्वार यांच्या मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के आहे, तर कार व इतर अपघातात मृत्यूंचे प्रमाण १७ टक्के आहे. त्यामध्ये हेल्मेट न वापरल्याने डोके फुटून झालेले अपघात ८५ टक्के आहे. तसेच कार अपघातातील बहुतांशी मृत्यू सिटबेल्ट न लावल्याने झाल्याचे आढळते.

देशात विविध आजाराने होणाºया मृत्यूच्या प्रमाणापेक्षा अपघातात ठार होणाºयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून वाहतुकीचे नियम पाळणे, तसेच शिस्तबद्धता आल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. अनेक देशांमध्ये वाहतुकीविषयीचे नियम व कायदे कडक आहेत. तसेच त्याचे तेथील नागरिकांकडून काटेकोरपणे पालनही केले जाते. आपणही जागरूकपणा आणल्यास हे प्रमाण दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, असेही ओसवाल यांनी स्पष्ट केले.

रोटरीचे अध्यक्ष मुकेश जैन यांनी स्वागत व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास पोलीस अधिकारी, रोटरीचे पदाधिकारी, टेम्पोचालक, बसचालक, रिक्षाचालक, स्कूल बस, विद्यार्थी वाहतूक, आदींच्या चालकांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सागर पाटील व सत्यनारायण धूत यांनी सूत्रसंचालन केले. संजय घायतिडक यांनी आभार मानले.इचलकरंजी येथे वाहतूक सुरक्षा सप्ताहांतर्गत रस्ते सुरक्षा याविषयी श्रीपाल ओसवाल यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस