शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Kolhapur- शिक्षणाचा परीघ: स्पर्धात्मक, कौशल्याकडे विद्यार्थ्यांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:33 IST

जयसिंगपूर शहर शिक्षणाचे माहेरघर बनले 

संदीप बावचेजयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा संमिश्र कल दिसून येत आहे. नवनव्या तंत्रज्ञानाच्या संशोधन प्रवृत्तीत वाढ होत असली तरी कौशल्य व स्पर्धात्मक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. प्राथमिक शाळा कात टाकत आहेत. विशेषत: जयसिंगपूर शहर शिक्षणाचे माहेरघर बनले आहे. एकूणच कृषिप्रधान या तालुक्याला शैक्षणिक क्रांतीची झालर असली तरी शिक्षणाचे महत्त्व आणखी रुजविण्यासाठी संस्थाचालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. येथील युवकांना पारंपरिक शेती, व्यवसायाबरोबर तांत्रिक शिक्षणाची गरज ओळखून ३५ वर्षांपूर्वी तालुक्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांची सुरुवात झाली. नवनवे तंत्रज्ञान, संशोधन, विद्यार्थी विकास असे विविध उपक्रम राबवून व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्षेत्र निर्माण करून त्यांना उद्योग व नोकरीसाठी नवी वाट निर्माण करून देण्यात डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी, शरद इन्स्टिट्यूट, दत्त पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी याचबरोबर इतर तंत्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांचा या तालुक्यांच्या विकासामध्ये वाटा आहे.मधल्या काळात खासगी शिक्षण संस्था वाढल्यामुळे जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थी संख्या कमी झाली होती. त्यानंतर शिक्षकवर्ग जागृत झाला. जिल्हा परिषद शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थी संख्या वाढविण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यामुळेच शासकीय शाळांना चांगले दिवस येत आहेत. सीईटी, टीईटी अशा प्रवेशपात्र परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होत आहे. कला, वाणिज्यबरोबरच विज्ञान शाखांमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे दिसून येते. डिप्लोमा, डिग्रीची अनेक महाविद्यालयांचे पेव फुटल्यानंतर डिप्लोमा, डिग्रीचे शिक्षण हे प्रतिष्ठेचे असे समजून विद्यार्थ्यांचा कल वाढला. मात्र, अशी अनेक महाविद्यालये बंद पडली आहेत.तालुक्यात जयसिंगपूर, कुरुंदवाडमधील उच्च महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. याठिकाणी प्रवेश मर्यादा संपल्यानंतर विद्यार्थी सांगली, मिरज, इचलकरंजीसारख्या शहरात शिक्षणसंस्थांचा पर्याय निवडतात. एकूणच नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, शासकीय शिक्षण व्यवस्थेत होत असलेला बदल त्यामुळे शैक्षणिक क्षेत्राचा आलेख वाढेल, अशी अपेक्षा आहे.

स्पर्धात्मक अभ्यासक्रमाकडे कलग्रामीण भागामध्ये स्पर्धात्मक अभ्यासक्रमाकडे कल वाढल्यामुळे प्रज्ञावंत विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळत आहेत, तर तत्काळ उत्पन्न सुरू होईल या दृष्टिकोनातून अन्य विद्यार्थी कौशल्य अभ्यासक्रमाकडे वळत असल्याचे तालुक्यात चित्र आहे.शिक्षण विभागाचे नियोजनजिल्हा परिषद शाळांचा पट वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. अंगणवाड्यांमधील मुलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गुणवत्ता, पट व स्पर्धात्मक असे धोरण राबविले जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभाग नियोजन करत आहे.

दृष्टिक्षेपात शैक्षणिक सोय

  • तीन वरिष्ठ महाविद्यालये
  • ३६६३ एकूण विद्यार्थी संख्या
  • कौशल्य विकास शिक्षण संस्था : १
  • आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालये : १
  • होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये : २
  • अभियांत्रिकी महाविद्यालये : ३
  • कृषी महाविद्यालये : २
  • औषध निर्माणशास्त्र महाविद्यालये : २
  • नर्सिंग कॉलेज : २
  • फिजिओथेरपी महाविद्यालये : १

शाळांची संख्या

  • प्राथमिक शाळा : १६४
  • माध्यमिक शाळा : ६८
  • उच्च माध्यमिक शाळा : २९
  • इंग्रजी माध्यम शाळा : ३४
  • नगरपालिका शाळा : ९
  • शासकीय निवासी शाळा : १
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था : ५
  • आश्रमशाळा : ४
  • खासगी शाळा : ६३
  • उर्दू शाळा : ३७
  • कन्नड शाळा : १
  • पशुधन संस्था : १
  • शिरोळ तालुका एकूण शाळा : ३०४

कौशल्य आधारित शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसून येते. पारंपरिक अभ्यासक्रम हा समाजासाठी उपयोग नाही असे होऊ शकत नाही. कला, विज्ञान, वाणिज्य क्षेत्रातही विविध संधी उपलब्ध आहेत. आवडीचे शिक्षण घेत असताना हे शिक्षण काय आहे याची माहिती विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. संधी असलेले व आवडणाऱ्या अभ्यासक्रमाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभारण्यासाठी सक्षम बळ मिळेल. - प्राचार्य डॉ. एस. ए. मांजरे, जयसिंगपूर महाविद्यालय.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी