शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी शहराकडे ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा आहे. त्यात अधिकतर उपनगर आणि शहरालगतच्या दहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा आहे. त्यात अधिकतर उपनगर आणि शहरालगतच्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील गावांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरातील विविध ३५ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेची (सीईटी) प्रतीक्षा लागली आहे.

ग्रामीण भागातील गडहिंग्लज, कागल, राधानगरी, इचलकरंजी, वारणा आदी परिसरातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी हे त्यांच्या गावापासून जवळ असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होतात. मात्र, उपनगरे आणि शहरालगतच्या करवीर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थ्यांचा शहरातील महाविद्यालयांमधील प्रवेशाकडे ओढा आहे. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणि विद्यार्थ्यांची धावपळ थांबविण्याच्या उद्देशाने शहरातील ३५ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. शहरातील अकरावीची प्रवेशक्षमता १४८६०, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५० महाविद्यालये असून त्यांची प्रवेशक्षमता ३५ हजार इतकी आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून आयटीआयकडील विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने शहर आणि ग्रामीण भागातील अकरावीच्या ४० ते ६० टक्के जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहत नसल्याचे चित्र आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया शहरात ऑनलाईन तर ग्रामीण भागात ऑफलाईन पध्दतीने राबविली जाते. यावर्षीदेखील हीच पध्दत राहणार आहे. प्रवेश प्रक्रिया सीईटीच्या गुणांवर होणार असल्याने या परीक्षेची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.

पॉईंटर

शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये : ३५

एकूण जागा : १४८६०

गेल्यावर्षी किती अर्ज आले : १२९६१

किती जणांनी प्रवेश घेतला : ६८७३

किती जागा रिक्त राहिल्या : ७८०७

चौकट

शहरातील ४० टक्के जागा रिक्त

गेल्या तीन वर्षांपासून अकरावीसाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होण्याकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे दिसत आहे. साधारणत: ४० ते ५० टक्के जागा रिक्त राहत असल्याचे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.

ऑनलाईन प्रवेश व्हावेत

प्रवेशाची प्रक्रिया गतीने होण्यासाठी ऑनलाईन पद्धत महत्त्वाची आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांप्रमाणे यावर्षीही शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व्हावी.

-प्रभाकर हेरवाडे, सचिव, दि. न्यू एज्युकेशन सोसायटी.

शहरातील महाविद्यालयांच्यादृष्टीने अकरावीसाठी ऑनलाईन प्रक्रिया, तर ग्रामीण भागासाठी ऑफलाईन प्रक्रिया योग्य आहे. ती यापुढेही कायम राहावी.

-सी. एम. गायकवाड, आजीव सेवक, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग.