शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

हाळवणकर यांना बळ, इचलकरंजीत कमळ

By admin | Updated: October 20, 2014 00:42 IST

लोकसभेसारखीच स्थिती

राजाराम पाटील / अतुल आंबी - इचलकरंजी --विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय, राष्ट्रवादी कॉँग्रेससह भाजप-शिवसेना यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी इचलकरंजीकरांनी आमदार सुरेश हाळवणकर यांना बळ देत पुन्हा कमळ फुलविले. हाळवणकर व कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यात लढत झाली. आमदार हाळवणकर यांना १५,२२५ चे मताधिक्य मिळाले, तर राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्यासह सर्वांनाच अनामत गमवावी लागली.राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये आज, रविवारी सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात झाली. चौदा टेबलांवर होणाऱ्या मतमोजणीसाठी १८ फेऱ्या होत्या, तर पोस्टल ३३४ मते दोन टेबलांवर मोजली गेली. सुरुवातीच्या फेरीपासूनच हाळवणकर यांनी मताधिक्य घेतले. पहिल्या १४ इलेक्ट्रॉनिक यंत्रांत १ ते १३ यंत्रे कोरोची गावाची व एक तारदाळमधील होते. या फेरीत हाळवणकर यांना ६०३७, आवाडेंना ३७०३ व कारंडेंना ६८६ मते मिळाली. मतमोजणीच्या फेऱ्या मोजल्या जात असताना सुरेश हाळवणकर यांचे मताधिक्य वाढत गेले.हाळवणकर यांना चंदूर वगळता ग्रामीण परिसरातील चार गावांत मताधिक्य मिळाले, तर शहापूर, नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ व ८, विक्रमनगर, प्रभाग क्रमांक २ व ९, तसेच गावभागातील अवधूत आखाडा, टाकवडे वेस, बौद्ध विहार, आंबी गल्ली, श्रीपादनगर, जुना चंदूर रोड परिसरात आवाडेंना, तर उर्वरित शहरात हाळवणकर यांना मताधिक्य मिळाले. राज्यात आघाडी फुटली आणि भाजप-शिवसेना युती तुटली आणि कॉँग्रेसचे प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे मदन कारंडे, भाजपचे सुरेश हाळवणकर, शिवसेनेचे मुरलीधर जाधव असे उमेदवार उभे राहिले. बहुरंगी लढतीत आवाडे, हाळवणकर यांच्या स्पर्धेत राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनीही आपले घोडे पुढे दामटले आणि रंगत निर्माण केली; पण मतमोजणीनंतर मात्र आवाडे-हाळवणकर अशीच एकास एक लढत झाली आणि आवाडे यांना हार पत्करावी लागली.पत्रकारांचे ठिय्या आंदोलनमतमोजणी होणाऱ्या राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना त्यांच्या कॅमेऱ्यासह प्रवेश देण्यास निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी नकार दिल्याने सुमारे दीड तास पत्रकारांना ठिय्या आंदोलन करावे लागले. ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या बातम्यांचे वृत्त चित्रवाहिनीवर झळकू लागल्याने अखेर जिरंगे यांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनी छायाचित्रकार व पत्रकारांना प्रवेश दिला.‘नोटा’ची १५०५ मतेनिवडणुकीसाठी एकूण १ लाख ९९ हजार ९४९ मतदान झाले होते. त्यापैकी ४७.११ टक्के मते हाळवणकरांना, ३९.५ टक्के मतदान आवाडेंना, तर ७.५ टक्के कारंडे यांना मिळाली. तसेच, मतदानाचा (नोटा) हक्क ०.७५ टक्के मतदारांनी बजावला.पोस्टाच्या १५४मतपत्रिका अवैधपोस्टामार्फत ३३४ मतपत्रिका मिळाल्या. त्यापैकी फक्त १५० मतपत्रिका वैध ठरल्या. त्यामध्ये ७९ मते हाळवणकरांना, ४९ मते आवाडेंना व १२ मते अन्य उमेदवारांना मिळाली. विशेष म्हणजे १२०० मतपत्रिका पोस्टल मतदारांसाठी पाठविण्यात आल्या होत्या.लोकसभेसारखीच स्थितीनुकत्याच झालेल्या एप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकीवेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राष्ट्रीय कॉँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यात २० हजार मतांचा फरक होता. काहीसा कमी होत, तसाच फरक विधानसभा निवडणुकीतही आमदार हाळवणकर-प्रकाश आवाडेंमध्ये राहिला.कडक बंदोबस्त मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र व शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पोलीस निरीक्षक भीमानंद नलवडे, संजय साळुंखे, सतीश पवार यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुख मंजू थापा हे प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. चार दिवस स्ट्रॉँगरूममध्ये ठेवलेल्या मतपेट्यांची सुरक्षा व्यवस्था या दलाने पार पाडली.