शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

ठिबकचा उत्पादनवाढीवर शिडकाव...!

By admin | Updated: February 9, 2015 23:58 IST

पाणी बचत, उत्पादन वाढ : जिल्ह्यात१३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आले ‘ठिबक’खाली

दत्ता पाटील - म्हाकवे -जमिनीला कायम वाफसा अवस्थेत ठेवण्यासाठी ऊस व फळबागेसह भाजीपाला पिकांमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे हितावह आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन रासायनिक खतांचाही अधिक कार्यक्षमतेने वापर करता येतो. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होऊन दर्जेदार उत्पादनही मिळत असल्याचा निष्कर्ष कृषितज्ज्ञांना आला. जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले. पाणी बचतीसह उत्पादन वाढ, असा दुहेरी फायदा यामुळे होत आहे.ठिबक सिंचन हा शेतीसाठी योग्य पर्याय आहे. जमिनीची प्रत टिकून राहण्यासाठी, मुळांच्या वाढीला, पिकांच्या योग्य वाढीसाठी, पाणीधारण क्षमता वाढून पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबविण्यासाठी ठिबक पर्याय आहे. मुळांच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचे संतुलन साधले गेल्याने उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होते. तसेच ४५ टक्क्यांपर्यंत पाणी बचत होते. ठिबक सिंचनामध्ये सूक्ष्मनलिका पद्धत, दाबनियंत्रण असणारी व नसणारी डिपर्स पद्धत, तसेच लॅटरलचे आत ड्रिपर्स असणारी व ड्रिपर्स नसणारी पद्धत कार्यान्वित आहे. जमिनीच्या पृष्ठभागाखाली दाब नियंत्रण असलेली व दाब नियंत्रण नसणारी ड्रिपर्स या दोन्ही पद्धतींचा वापर करता येतो.रासायनिक खते ठिबकद्वारे दिल्याने ही खते थेट पिकांच्या मुळांच्या सहवासात येतात. त्यामुळे खतांचीही ३० टक्क्यांपर्यंत बचत होऊन उत्पादन खर्चावर मर्यादा येते. तण उगवत नसल्याने खुरपणी, आंतरमशागत व तणनाशकांचा खर्चही कमी होतो. दरम्यान, बारकाईने अभ्यास केला असता ठिबक केलेल्या शेतीतून अधिक उत्पादन मिळाल्याचे निष्कर्षाअंती दिसते.१९९८-९९ पासून सुरू झालेल्या ठिबक सिंचन योजनेला गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने यासाठी अनुदान देताना पीकनिहाय अनुदानाऐवजी लॅट्रोनच्या संस्थेवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सिंचन पद्धत शेतीच्या भविष्यासह शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी हितावह ठरणारी आहे.- मोहन आहोळे, जिल्हा अधीक्षक हंगामनिहाय पिकाला पाण्याची गरज वेगवेगळ्या प्रमाणात असते. उसासाठी हिवाळ्यामध्ये ठिबक संच दोन ते अडीच तास दररोज सुरू ठेवावा, तर उन्हाळ्यामध्ये साडेतीन ते चार तास तसेच पावसाळ्यात (पावसाने जास्त काळ दडी मारल्यास) आवश्यकतेनुसार एक ते दीड तास ठिबक संच सुरू ठेवावा.शासनाचे अनुदान, कारखान्याचे प्रोत्साहन