शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

ठिबकचा उत्पादनवाढीवर शिडकाव...!

By admin | Updated: February 9, 2015 23:58 IST

पाणी बचत, उत्पादन वाढ : जिल्ह्यात१३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आले ‘ठिबक’खाली

दत्ता पाटील - म्हाकवे -जमिनीला कायम वाफसा अवस्थेत ठेवण्यासाठी ऊस व फळबागेसह भाजीपाला पिकांमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे हितावह आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन रासायनिक खतांचाही अधिक कार्यक्षमतेने वापर करता येतो. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होऊन दर्जेदार उत्पादनही मिळत असल्याचा निष्कर्ष कृषितज्ज्ञांना आला. जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले. पाणी बचतीसह उत्पादन वाढ, असा दुहेरी फायदा यामुळे होत आहे.ठिबक सिंचन हा शेतीसाठी योग्य पर्याय आहे. जमिनीची प्रत टिकून राहण्यासाठी, मुळांच्या वाढीला, पिकांच्या योग्य वाढीसाठी, पाणीधारण क्षमता वाढून पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबविण्यासाठी ठिबक पर्याय आहे. मुळांच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचे संतुलन साधले गेल्याने उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होते. तसेच ४५ टक्क्यांपर्यंत पाणी बचत होते. ठिबक सिंचनामध्ये सूक्ष्मनलिका पद्धत, दाबनियंत्रण असणारी व नसणारी डिपर्स पद्धत, तसेच लॅटरलचे आत ड्रिपर्स असणारी व ड्रिपर्स नसणारी पद्धत कार्यान्वित आहे. जमिनीच्या पृष्ठभागाखाली दाब नियंत्रण असलेली व दाब नियंत्रण नसणारी ड्रिपर्स या दोन्ही पद्धतींचा वापर करता येतो.रासायनिक खते ठिबकद्वारे दिल्याने ही खते थेट पिकांच्या मुळांच्या सहवासात येतात. त्यामुळे खतांचीही ३० टक्क्यांपर्यंत बचत होऊन उत्पादन खर्चावर मर्यादा येते. तण उगवत नसल्याने खुरपणी, आंतरमशागत व तणनाशकांचा खर्चही कमी होतो. दरम्यान, बारकाईने अभ्यास केला असता ठिबक केलेल्या शेतीतून अधिक उत्पादन मिळाल्याचे निष्कर्षाअंती दिसते.१९९८-९९ पासून सुरू झालेल्या ठिबक सिंचन योजनेला गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने यासाठी अनुदान देताना पीकनिहाय अनुदानाऐवजी लॅट्रोनच्या संस्थेवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सिंचन पद्धत शेतीच्या भविष्यासह शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी हितावह ठरणारी आहे.- मोहन आहोळे, जिल्हा अधीक्षक हंगामनिहाय पिकाला पाण्याची गरज वेगवेगळ्या प्रमाणात असते. उसासाठी हिवाळ्यामध्ये ठिबक संच दोन ते अडीच तास दररोज सुरू ठेवावा, तर उन्हाळ्यामध्ये साडेतीन ते चार तास तसेच पावसाळ्यात (पावसाने जास्त काळ दडी मारल्यास) आवश्यकतेनुसार एक ते दीड तास ठिबक संच सुरू ठेवावा.शासनाचे अनुदान, कारखान्याचे प्रोत्साहन