शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाला आम्ही महिलांच्या रांगेत उभारायचे की पुरुषांच्या?, तृतीयपंथीयांचा सवाल 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 25, 2024 15:33 IST

स्वतंत्र रांग किंवा प्राधान्य देण्याची मागणी

इंदुमती गणेशकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा लोकशाहीचा मोठा उत्सव सध्या साजरा होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना तृतीयपंथीयांचा वर्ग मात्र आजही मतदानाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. मतदान केंद्रांवर महिलांची व पुरुषांची स्वतंत्र रांग असते, पण आम्ही कोणत्या रांगेत थांबायचे, असा प्रश्न तृतीयपंथीयांना पडला आहे. त्यामुळे मतदानासाठी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग बनविण्याची किंवा मतदान करण्यासाठी प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.लोकसभेसाठी जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक विभागाकडून मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. मतदारांना समारंभ वाटावा, असे मतदान केंद्र साकारले जाणार आहे. तेथे त्यांना पाळणाघरापासून पाणी, स्वच्छतागृह, बसण्याची सोय अशा सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहे. वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना घरून टपाली मतदानाची सोय केली आहे. पण यामध्ये तृतीयपंथी मतदारांचा फारसा विचार झालेला दिसत नाही.

बघण्याचा दृष्टिकोन विचित्रतृतीयपंथी मतदार जेंव्हा मतदान केंद्रांवर येतात तेंव्हा महिला व पुरुष मतदारांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. दुसऱ्या ग्रहावरची व्यक्ती आली आहे की काय अशा नजरेतून त्यांना सगळे न्याहाळत असतात. महिलांच्या किंवा पुरुषांच्या कुणाच्याही रांगेत थांबले तरी त्यांची चेष्टा होते.

जिल्ह्यात १८१ मतदारमतदार नोंदणी अत्यावश्यक असल्याचे समजल्यानंतर तृतीयपंथीय मतदारांमध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. तर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ४८ हजार तृतीयपंथी आहे.

तृतीयपंथी समुदायाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नेहमी उपेक्षितच राहिला आहे. चेष्टा आणि विचित्र नजरांचा सामना करावा लागत असल्याने ते मतदानाला येण्याचे टाळतात. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग करावी किंवा मतदानाला त्यांना प्राधान्य द्यावे. -मयुरी आळवेकर, अध्यक्षा, मैत्री तृतीयपंथीय संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTransgenderट्रान्सजेंडरVotingमतदानElectionनिवडणूक