शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मतदानाला आम्ही महिलांच्या रांगेत उभारायचे की पुरुषांच्या?, तृतीयपंथीयांचा सवाल 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 25, 2024 15:33 IST

स्वतंत्र रांग किंवा प्राधान्य देण्याची मागणी

इंदुमती गणेशकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा लोकशाहीचा मोठा उत्सव सध्या साजरा होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना तृतीयपंथीयांचा वर्ग मात्र आजही मतदानाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. मतदान केंद्रांवर महिलांची व पुरुषांची स्वतंत्र रांग असते, पण आम्ही कोणत्या रांगेत थांबायचे, असा प्रश्न तृतीयपंथीयांना पडला आहे. त्यामुळे मतदानासाठी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग बनविण्याची किंवा मतदान करण्यासाठी प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.लोकसभेसाठी जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक विभागाकडून मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. मतदारांना समारंभ वाटावा, असे मतदान केंद्र साकारले जाणार आहे. तेथे त्यांना पाळणाघरापासून पाणी, स्वच्छतागृह, बसण्याची सोय अशा सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहे. वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना घरून टपाली मतदानाची सोय केली आहे. पण यामध्ये तृतीयपंथी मतदारांचा फारसा विचार झालेला दिसत नाही.

बघण्याचा दृष्टिकोन विचित्रतृतीयपंथी मतदार जेंव्हा मतदान केंद्रांवर येतात तेंव्हा महिला व पुरुष मतदारांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. दुसऱ्या ग्रहावरची व्यक्ती आली आहे की काय अशा नजरेतून त्यांना सगळे न्याहाळत असतात. महिलांच्या किंवा पुरुषांच्या कुणाच्याही रांगेत थांबले तरी त्यांची चेष्टा होते.

जिल्ह्यात १८१ मतदारमतदार नोंदणी अत्यावश्यक असल्याचे समजल्यानंतर तृतीयपंथीय मतदारांमध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. तर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ४८ हजार तृतीयपंथी आहे.

तृतीयपंथी समुदायाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नेहमी उपेक्षितच राहिला आहे. चेष्टा आणि विचित्र नजरांचा सामना करावा लागत असल्याने ते मतदानाला येण्याचे टाळतात. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग करावी किंवा मतदानाला त्यांना प्राधान्य द्यावे. -मयुरी आळवेकर, अध्यक्षा, मैत्री तृतीयपंथीय संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTransgenderट्रान्सजेंडरVotingमतदानElectionनिवडणूक