शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मतदानाला आम्ही महिलांच्या रांगेत उभारायचे की पुरुषांच्या?, तृतीयपंथीयांचा सवाल 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 25, 2024 15:33 IST

स्वतंत्र रांग किंवा प्राधान्य देण्याची मागणी

इंदुमती गणेशकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा लोकशाहीचा मोठा उत्सव सध्या साजरा होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना तृतीयपंथीयांचा वर्ग मात्र आजही मतदानाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. मतदान केंद्रांवर महिलांची व पुरुषांची स्वतंत्र रांग असते, पण आम्ही कोणत्या रांगेत थांबायचे, असा प्रश्न तृतीयपंथीयांना पडला आहे. त्यामुळे मतदानासाठी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग बनविण्याची किंवा मतदान करण्यासाठी प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.लोकसभेसाठी जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक विभागाकडून मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. मतदारांना समारंभ वाटावा, असे मतदान केंद्र साकारले जाणार आहे. तेथे त्यांना पाळणाघरापासून पाणी, स्वच्छतागृह, बसण्याची सोय अशा सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहे. वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना घरून टपाली मतदानाची सोय केली आहे. पण यामध्ये तृतीयपंथी मतदारांचा फारसा विचार झालेला दिसत नाही.

बघण्याचा दृष्टिकोन विचित्रतृतीयपंथी मतदार जेंव्हा मतदान केंद्रांवर येतात तेंव्हा महिला व पुरुष मतदारांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. दुसऱ्या ग्रहावरची व्यक्ती आली आहे की काय अशा नजरेतून त्यांना सगळे न्याहाळत असतात. महिलांच्या किंवा पुरुषांच्या कुणाच्याही रांगेत थांबले तरी त्यांची चेष्टा होते.

जिल्ह्यात १८१ मतदारमतदार नोंदणी अत्यावश्यक असल्याचे समजल्यानंतर तृतीयपंथीय मतदारांमध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. तर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ४८ हजार तृतीयपंथी आहे.

तृतीयपंथी समुदायाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नेहमी उपेक्षितच राहिला आहे. चेष्टा आणि विचित्र नजरांचा सामना करावा लागत असल्याने ते मतदानाला येण्याचे टाळतात. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रांग करावी किंवा मतदानाला त्यांना प्राधान्य द्यावे. -मयुरी आळवेकर, अध्यक्षा, मैत्री तृतीयपंथीय संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTransgenderट्रान्सजेंडरVotingमतदानElectionनिवडणूक