शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेत शिवसेनेचे गीत; पुन्हा सुजित

By admin | Updated: October 20, 2014 00:42 IST

आवळेंची पराभवाची हॅट्ट्रिक..काँग्रेसचा डावच मोडीत काढला

दत्ता बीडकर / आयुब मुल्ला ल्ल हातकणंगलेशिवसेनेचे गीत गात, हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघात पुन्हा सुजितच हे आमदार सुजित मिणचेकर यांनी एकतर्फी मैदान मारत दाखवून दिले. मिणचेकर यांनी भगवा फडकावत आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार जयवंतराव आवळे यांचा तब्बल २९ हजार ३७० मतांनी पराभव केला. काँग्रेस दुसऱ्या स्थानी, तर जनसुराज्य तिसऱ्या स्थानी फेकला गेला. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असतानाही राष्ट्रवादीचा उमेदवार चार हजार मतांचा आकडाही पार करू शकला नाही. या निकालामुळे कोण कोणाबरोबर याचे गणित उलगडले आहे. शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर विजयी घोषित होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष करीत गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली.आघाडीची बिघाडी आणि महायुतीचा काडीमोड या घटनांमुळे या मतदारसंघात काट्याची टक्कर होईल, अशी स्थिती होती. मात्र, आज झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेने एकतर्फी हा गड राखत दुसऱ्यांदा या मतदारसंघात भगवा फडकविला.हातकणंगले शासकीय धान्य गोदामामध्ये आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी धिम्या गतीने सुरू होती. इतर मतदारसंघांत पाच फेऱ्या पूर्ण झाल्या, तरी हातकणंगलेत पहिलीच फेरी सुरू होती. १४ टेबलांवर मतमोजणी सुरू होती. एकूण २३ फेऱ्यांमध्ये २ लाख २३ हजार मते मोजणीसाठी यंत्रणा सुरू झाली. सकाळी नऊ वाजता पहिली फेरी पूर्ण झाली. पहिल्या फेरीपासूनच मिणचेकर आघाडीवर होते. पहिल्या फेरीत जनसुराज्यचे राजीव आवळे यांच्यापेक्षा २११ मतांनी आघाडी घेणारे मिणचेकर दुसऱ्या फेरीतही १७२८ मतांनी आघाडीवर राहिले. पहिल्या व दुसऱ्या फेरीत जयवंतराव आवळे तिसऱ्या स्थानी होते. तिसऱ्या फेरीत मिणचेकर यांनी काँग्रेसचे जयवंतराव आवळे यांच्यापेक्षा १८३६ मते जादा मिळवीत तिसऱ्या फेरीत ३०८७ मतांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीपासून २३ फेरीअखेर काँग्रेस आणि शिवसेना असा दुरंगी सामना रंगला आणि प्रत्येक फेरीत शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर यांनी एक हजार ते बाराशे मतांची आघाडी घेत मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निर्णायक २९,३७० मते मिळवीत विजयी आकडा पार केला. आवळेंची पराभवाची हॅट्ट्रिक २००४ मध्ये तत्कालीन मंत्री असताना जयवंत आवळे यांचा जनसुराज्यचे राजीव आवळे यांनी पराभव केला होता. २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. मिणचेकर यांच्याकडून २९,३७० मतांनी पराभूत झाले, तर त्यांचे पुत्र राजू आवळे २००९च्या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे आवळे यांच्या घराण्याची पराभवाची हॅट्ट्रिक झाली. माने गटाकडून विजयोत्सवगेल्या दोन लोकसभा निवडणुकीत तसेच गत विधानसभा निवडणुकीतही आघाडी असल्यामुळे माजी खासदार निवेदिता माने गटाला गुलाल उधळता आला नाही. परंतु, या निवडणुकीत मात्र डॉ. मिणचेकर यांच्या विजयात आपला सहभाग नोंदवीत कार्यकर्त्यांनी अखेर गुलाल लावला व विजयोत्सव साजरा केला. काँग्रेसचा डावच मोडीत काढलाकॉँग्रेसमध्ये आवाडे-महाडिक-आवळे यांचे ऐक्य झाले; परंतु आवाडे यांना मानणाऱ्या हुपरी परिसरातील १३ गावांत तसेच महाडिक यांच्या शिरोली गावातूनच सेनेने मताधिक्य घेत कॉँग्रेसचा डावच मोडीत काढला.शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रनिलेवाडी, अंबपवाडी, भादोले, भेंडवडे व माले वगळता काँग्रेसला कोणत्याही गावांमध्ये मताधिक्य मिळाले नाही. ५८ गावांपैकी ५३ गावांमध्ये शिवसेनेने आघाडी घेतली. माणगाववाडी, साजणी, तिळवणी, रुई, इंगळी, पट्टणकोडोली, तळंदगे, हुपरी, रेंदाळ, रांगोळी, जंगमवाडी या गावांनी यावेळीही सेनेला आघाडी दिली.शेतकरी संघटनेलाअल्प मते या संघटनेचे उमेदवार स्वत:च्या गावात २०च्या वर सुद्धा मताधिक्य घेऊ शकले नाहीत. इतर गावांतसुद्धा दोन, तीन, आकड्यांवरतीच समाधान मानावे लागले. त्यामुळे संघटनेची किंबहुना महायुतीची मते कुठे गेली, असा प्रश्न अनेकजण करीत होते.