शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

काँग्रेससह शाहू छत्रपती यांनाही २६ वर्षांनी गुलाल, 'असाही' विलक्षण योगायोग..

By विश्वास पाटील | Updated: June 5, 2024 17:21 IST

कोल्हापूर लोकसभेचे राजकारण : संयम ठेवून सामाजिक काम केल्याचे मिळाले बक्षीस

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने मंगळवारी काँग्रेस पक्षासह शाहू छत्रपती यांनाही तब्बल २६ वर्षांनी गुलाल लावला. या मतदारसंघातून शाहू छत्रपती यांचे नाव १९९८ च्या निवडणुकीत उमेदवार म्हणून चर्चेत आले होते; परंतु ही संधी मिळण्यासाठी त्यांना तब्बल २६ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. त्यांनी इतकी वर्षे संयम पाळला, असेच काहीसे त्यांच्या बाबतीत अनुभवास आले. सर्वच पक्षांशी उत्तम संबंध आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून त्यांना कोल्हापूरच्या जनतेने लोकशाहीच्या मंदिरात अधिमान्यता दिली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला १९९८ ला शेवटचा विजय मिळाला. ही लढत अत्यंत चुरशीची झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्याबद्दल मतदारसंघात कमालीची नाराजी होती. कारण सलग पाचवेळा ते खासदार होते. राज्यात तेव्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात युतीची हवा होती. त्यावेळी कोल्हापूरचा उमेदवार कोण? याबद्दल चर्चा सुरू होती. त्यामध्ये शिवसेनेकडून शाहू छत्रपती आणि विक्रमसिंह घाटगे यांची नावे पुढे आली होती.त्याच दरम्यान काही दिवस अगोदर मुख्यमंत्री मनोहर जोशी हे कागलला शाहू कारखान्याच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी घाटगे यांना तुम्ही आता फार काळ बाहेर राहू नका, शिवसेनेची एसटी भरत आली आहे, त्यात लवकर बसा असा सल्ला देऊन लोकसभा उमेदवारीची ऑफर दिली होती. त्यामुळे कोल्हापुरातून शिवसेनेची उमेदवारी कुणाला द्यायची, अशी चर्चा सुरू झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घाटगे यांच्या नावाला प्रथम पसंती दिली. तेव्हा शाहू छत्रपती यांचा सामाजिक वावरही आजच्यासारखा नव्हता. शिवाय घाटगे यांची शाहू कारखाना राज्यात भारी चालवल्याने सहकार क्षेत्रातील स्वच्छ चारित्र्याचा राजकीय नेता अशी प्रतिमा जनमाणसांत चांगलीच रुजली होती. ती कॅश करण्यासाठी त्यांचीच उमेदवारी शिवसेनेने नक्की केली.घाटगे यांच्यासमोर उदयसिंहराव गायकवाड यांचा निभाव लागणार नाही, हे हेरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वेगळेच फासे टाकले आणि गायकवाड यांना थांबवले व कागलच्या राजकारणातील घाटगे यांचे पारंपरिक विरोधक सदाशिवराव मंडलिक यांना मैदानात उतरविले. ही लढत त्यांनीच जिंकली. शाहू छत्रपती यांनी शिवसेनेच्या निर्णयाचा आदर करून ते घाटगे यांच्या पाठीशी राहिले. त्यानंतर २००९ मध्येही त्यांचे नाव राष्ट्रवादीकडून चर्चेत आले होते. तेव्हा संभाजीराजे यांना उमेदवारी मिळाली. शाहू छत्रपती सामाजिक कामात सक्रिय राहिले. टोल आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन अशा विविध आंदोलनांत ते पुढे राहिले. कुठेही राजकीय महत्त्वाकांक्षा न दाखवता समाजबांधणीचे काम त्यांनी केले. त्याचे फळ त्यांना या निवडणुकीत मिळाले.

असाही विलक्षण योगायोग..लोकसभेला १९९८ ला काँग्रेसचा विजय झाला; परंतु लगेच १९९९ ला काँग्रेस दुभंगली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर १९९९ ला मंडलिक यांनीच ही जागा जिंकली व तेव्हापासून ही जागा राष्ट्रवादीच्याच वाट्याला गेली. ती पुन्हा राष्ट्रवादी दुभंगल्यावरच (२०२३) काँग्रेसच्या वाट्याला आली हा देखील एक विलक्षण योगायोगच म्हटला पाहिजे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीcongressकाँग्रेस