शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST

-- दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोरोना या महामारीने प्रत्येकाच्या श्वासावरच हल्ला चढवला. अशावेळी गंभीर स्थितीला पोहोचलेल्या रुग्णांना जगवले ते ...

--

दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोरोना या महामारीने प्रत्येकाच्या श्वासावरच हल्ला चढवला. अशावेळी गंभीर स्थितीला पोहोचलेल्या रुग्णांना जगवले ते ऑक्सिजनने... ऑक्सिजनचे महत्त्व सगळ्यांनाच नव्याने कळून चुकले. म्हणूनच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बसवण्यात आले आहेत. हवेतील ऑक्सिजन शोषून घेणाऱ्या या १४ प्रकल्पांमधून १०० टन ऑक्सिजन निर्मिती होणार असून त्यापैकी चार प्रकल्प नुकतेच कार्यान्वित केले आहेत. यानिमित्ताने ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत आता कोल्हापूर स्वयंपूर्ण बनले आहे.

----

मे २०२१... जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना एकामागोमाग एक फाेन येऊ लागले... साहेब, आमच्या रुग्णालयात आता दोन तासच पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक आहे... ऑक्सिजनवर १५ रुग्ण आहेत... तातडीने ऑक्सिजनचे सिलिंडर पाठवा... ऑक्सिजनवर असलेल्या हजारो रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू असताना, इकडे अधिकारीच जणू व्हेंटिलेटरवर होते... कारण एकच, ऑक्सिजनचा तुटवडा. मागणीच्या निम्मा पुरवठा. जिल्ह्यात रोज ५२ ते ५६ टन ऑक्सिजन लागायचा आणि पुरवठा व्हायचा ३२ ते ३५ टन. ही कठीण परिस्थिती हाताळताना प्रशासनाच्या लक्षात आले की, ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत लवकरच स्वयंपूर्ण बनले पाहिजे. एरवी शेवटच्या क्षणी अत्यवस्थ बनलेल्या रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. कोरोना मात्र या गृहितकाला अपवाद आहे. व्यक्ती कोणत्याही वयोगटातील असो, ऑक्सिजनची पातळी कमी व्हायला लागली की, कृत्रिम ऑक्सिजन लावण्याला पर्यायच नाही. एकाचवेळी हजारो रुग्णांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागण्याची ही पहिलीच वेळ होती.

जीवन म्हणजे काय? तर दोन श्वासांमधलं अंतर. जन्म आणि मृत्यूचा फेरा ठरतो, तो या श्वासावर. माणसाची श्वासोच्छवासाची क्षमता कमी झाली की, ऑक्सिजनची पातळी खालावते. अशावेळी कृत्रिम श्वासाद्वारे माणसाला जगविण्याचे काम करतो, ते ऑक्सिजन. मार्च २०२० मध्ये सुरू झालेल्या कोरोनाने आरोग्यदायी जीवनशैली आणि या श्वासाचे महत्त्व नव्याने जगाला पटवून दिले. समोर दिसणाऱ्या शत्रूला नामाेहरम करायला वेळ लागत नाही. पण इथे आपल्याला एका अदृश्य विषाणूशी लढायचे होते. प्रत्येक माणूस आपण या संसर्गापासून कसे दूर राहू, शरीरातील ऑक्सिजन पातळी कशी कमी होणार नाही, याची दक्षता घेऊ लागला. दिवसातून तीन-चार वेळा ऑक्सिमीटरवर तपासणी करूनही मनात शंकेची पाल चुकचुकलेली असायचीच. हा आजार थेट फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवरच हल्ला करतो. फुफ्फुसाला संसर्ग झाला की रुग्णाला ऑक्सिजन लावावा लागतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात ६० हजार लोकांना याची लागण झाली. त्यावेळी ३२ टन ऑक्सिजनची गरज असायची. दुसऱ्या लाटेत मात्र संसर्गाची तीव्रता अधिक होती. दीड लाखावर नागरिकांना याचा संसर्ग झाला आहे. हजारो रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. एक वेळ अशी आली की, रुग्णालयांमध्ये काही तासांसाठीच ऑक्सिजन शिल्लक असायचा. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई दहा-बारा दिवस ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टवर रात्रं-दिवस तळ ठोकून असायचे. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावणे ही वेळ येऊ नये यासाठी सगळे धडपडत होते. अखेर हा कठीण काळ निभावून नेण्यात यश आले. पण यावेळी मोठा धडा मिळाला, तो म्हणजे ऑक्सिजनबाबतीत स्वयंपूर्ण बनले पाहिजे. त्याआधीच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू झाली होती.

जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह आरोग्य यंत्रणेने जोरदार काम केले. आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी मिळून नियोजन केले आणि जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करण्यात आली. एप्रिल महिन्यात त्याची निविदा काढण्यात आली.