शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

जनसुराज्यचे समित कदम भाजप नेत्यांचे प्रिय कसे..?, अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:14 IST

राज्य सरकारने दिलेली वाय दर्जाची सुरक्षा हाही वादाचा विषय

कोल्हापूर : ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव घेऊन जनसुराज्यशक्ती युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम हे माझ्याकडे आले होते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकताच केला. यावर कदम यांनीही पलटवार केल्याने या दोघांमधील कलगीतुरा राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे.सध्या जनसुराज्यशक्ती पक्षाच्या युवा आघाडीचे कदम हे राज्याचे अध्यक्ष असले तरी ते भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या किचन कॅबिनेटमधील सदस्य मानले जातात. त्यामुळे इतर पक्षातील महत्त्वाच्या पदावर असलेले कदम भाजप नेत्यांना इतके का प्रिय आहेत यावरून सोशल मीडियावर घमासान सुरू आहे.कदम हे २०१६ पासून जनसुराज्यशक्ती पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचे वडील मिरज नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. घरातूनच राजकीय वारसा असलेल्या कदम यांचे मिरज हे हाेमग्राउंड असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा सर्वाधिक वावर आहे. हे दोन्ही जिल्हे वगळले तर कदम यांची ओळख फारशी नाही. मात्र, ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी फडणवीस यांचा प्रस्ताव घेऊन कदम हे माझ्याकडे आले होते, असा दावा माजी मंत्री देशमुख यांनी केल्यानंतर कोण हे कदम.. ? ते कुठले, त्यांचा अन् फडणवीस यांचा संबंध आलाच कसा..? उपमुख्यमंत्र्यांच्या ते इतके जवळसे कसे..? असे एक ना अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. कदम यांचे विविध राजकीय नेत्यांसोबतचे जुने फोटो पुन्हा पुढे आणले जात आहेत. त्यांना राज्य सरकारने दिलेली वाय दर्जाची सुरक्षा हाही वादाचा विषय बनला आहे.भाषाशैली, वक्तृत्वाची भुरळराजकीय वारसा असलेले कदम यांचे इंग्रजीवर चांगले प्रभुत्व आहे. एखादी गोष्ट ती सहजरित्या पटवून देऊ शकतात. शिवाय, राज्यभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरची त्यांची ऊठबस अनेकांना कोड्यात टाकणारी आहे. कदम यांना राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. ज्या पक्षाचा राज्यात एकच आमदार आहे त्या पक्षाच्या युवा आघाडीच्या अध्यक्षाला इतकी अतिमहत्त्वाची सुरक्षा कशी असाही सवाल उपस्थित केला जात आहे.भाजप नेत्यांशी घरोबासमित कदम हे राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या किती जवळ आहेत हे सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोवरून लक्षात येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या किचनकॅबिनेटमधील ते एक महत्त्वाचे सदस्य मानले जातात. कदम यांच्या घरगुती कार्यक्रमालाही राज्यातील अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली आहे.  आमदार विनय कोरे यांची मुंबईतील कामे करण्यात, भेटीगाठी घडवून आणण्यात ते पुढे असतात. कोरे व पंतप्रधान यांच्या भेटीवेळीही तेच प्रमुख असल्याप्रमाणे पुढे होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाAnil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस