शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

समरजीत घाटगे अज्ञान प्रकट करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकवीस वर्षांपूर्वी काम सुरू झालेल्या आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाण्याकडे शेतकऱ्यांसह आया-बहिणींचे डोळे लागले आहेत. उत्तूर, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : एकवीस वर्षांपूर्वी काम सुरू झालेल्या आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाण्याकडे शेतकऱ्यांसह आया-बहिणींचे डोळे लागले आहेत. उत्तूर, कडगाव परिसरातील हजारो एकर जमीन पाण्यासाठी आसुसलेली आहे. मात्र, समरजीत घाटगे राजकारणाच्या नादात चुकीचे वक्तव्य करीत आहेत. त्यांनी आपले अज्ञान प्रकट करू नये, असे टीकास्त्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर यांनी पत्रकातून सोडले.

आजूबाजूचे हिरवेगार शिवार झाले असताना आमची शेती पाण्यावाचून उजाड आणि भकास आहे. आमची माणसे मोलमजुरीसाठी पुणे, मुंबई आणि गोव्याकडे गेली आहेत. आता आंबेओहोळ प्रकल्प दृष्टीक्षेपात आल्यानंतर आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रकल्पाचे श्रेय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मिळणार म्हटल्यावर समरजीत घाटगे राजकीय द्वेषापोटी टीका करीत आहेत. विकास कामात अडथळा निर्माण करून त्यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात मीठ कालवू नये. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले पाहिजे, यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी शब्द दिला आहे. मात्र, या प्रकल्पाचे सुधारित मान्यतेचे २२७ कोटी गेले कोठे? असा प्रश्न अज्ञानातून घाटगे यांनी विचारला. त्यांनी जलसंपदा विभागाकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याची गरज असल्याचे सतीश पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

अशी आहे प्रकल्पाची वाटचाल...

प्रकल्पास १९९८ मध्ये २९ कोटी ३१ लाख निधीसह प्रशासकीय मान्यता मिळाली. भूसंपादन व पुनर्वसनाची तरतूद म्हणून ५ कोटी ३० लाख रुपये व प्रकल्पासाठी २४ कोटी ४१ लाख रुपये होते. लाभ क्षेत्रातील चार एकरांवरील क्षेत्राची अट मान्य नसल्याने पुनर्वसनासाठी जमिनी मिळण्यात अडचणी होत्या. मंत्री हसन मुश्रीफ हे जलसंपदा मंत्री असताना हेक्टरी ३६ लाख रुपयांचे पॅकेज जमिनींच्या मोबदल्यापोटी देण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे नियामक मंडळाकडे पाठविला. मात्र, राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्णपणे ठप्प झाले. दुसरी प्रशासकीय मान्यता २२७ कोटी ५४ लाख रुपये, त्यातील १७४ कोटी ३० लाख प्रकल्पावरील खर्च व ९८ कोटी ६० लाख पुनर्वसन पॅकेज, जमिनीसाठी तरतूद होती. त्यातील ५४ कोटी शिल्लक असल्याचे सतीश पाटील यांनी म्हटले आहे.