शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासाठी १४३ कोटी मंजूर, भूसंपादनासाठी स्वतंत्र समिती नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:35 IST

मंदिरातील हेमाडपंथी बांधकाम; शिखरांचे जतन होणार

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या आराखड्याला मंगळवारी उच्चाधिकार समितीने मान्यता दिली. याअंतर्गत मंदिराच्या मूळ हेमाडपंथी बांधकामाचे, ६४ योगिनींच्या मूर्ती, शिखर अशी मंदिर जतन संवर्धनाची कामे केली जाणार आहे. भूसंपादन कशा पद्धतीने करता येईल हे अभ्यासण्यासाठी नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. पुढील आठ दिवसात समिती अहवाल शासनाला सादर केल्यानंतर भूसंपादनावर निर्णय होईल.मंगळवारी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी दूरदृश्याप्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत ही मान्यता मिळाली. कोल्हापुरातून जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, नगररचना विभागाचे विनय झगडे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार उपस्थित होते.करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या १४४० कोटींच्या विकास आराखड्याला मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर अंबाबाई आराखड्याचा विषय पुढे गेला नव्हता. मंगळवारी मंत्रालयातून मात्र यावर शिक्कामोर्तब झाल्याने विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

पहिला टप्पा ५०० कोटींचामंदिराचा पहिला टप्पा ५०० कोटींचा असून, त्यात मंदिरांतर्गत सुधारणांचीच कामे १४३ कोटींची आहेत. आता भूसंपादन वगळून जतन संवर्धनाच्या कामांना मंजुरी दिली गेली आहे.

पुढे काय?पुरातत्व विभागामार्फत महिन्याभरात पूर्ण मंदिराची मोजमाप करून अंदाजपत्रक तयार केले जाईल. हे अंदाजपत्रक वित्त व नियोजन विभागाकडे जाईल. त्यांच्याकडून निधी वर्ग झाला की कामांना सुरुवात होईल.

हे होणार १४३ कोटींमध्येमंदिराच्या मूळ दगडी वास्तूचे जतन संवर्धन, ६४ योगिनींसह वास्तूवरील सर्व शिल्पांची, शिखराची डागडुजी, गळती काढणे, फरशा, अंतर्गत विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, फरशा, ड्रेनेज सिस्टीम ही मंदिर प्रकारातील जतन संवर्धनाची कामे केली जातील.

भूसंपादन अहवालाकडे लक्ष?मंदिरांतर्गत व बाह्य परिसरात दुकानदार, रहिवासी, कुळ अशा सर्व प्रकारचे मिळकतदार आहेत. या मिळकदारांची संख्या, मिळकतीचे मूल्यांकन, त्यांना टीडीआर, रक्कम किंवा अन्य कोणत्या पद्धतीने नुकसानभरपाई देता येईल, काय अडचणी येतील याचा अभ्यास करून समिती अहवाल शासनाला देणार आहे. त्यावर शासनाचा निर्णय अवलंबून असल्याने या अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.