शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉल्बीबंदी’च्या आवाहनास भरभरून प्रतिसाद-- आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !

By admin | Updated: May 29, 2015 00:05 IST

एक पाऊल बदलाचे : दोन गावांनी घेतला ‘डॉल्बीमुक्त गावा’चा ध्यास; गावोगावी बैठकां--‘लोकमत’ने सुरू केलेल्या लोकचळवळीमुळे गावागावांतील लोकांची मानसिकता बदलू लागली आहे.

अकरा वर्षांत पहिल्यांच होणार डॉल्बीशिवाय विवाहसोहळाआदर्की : येथील श्री भैरवनाथ उद्योग समूहातर्फे गेल्या अकरा वर्षांपासून सर्वधर्मीय बिगरहुंडा सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन केले जाते. हजारो वऱ्हाडमंडळींच्या साक्षीने नवरदेवाची मिरवणूक डॉल्बी वाजवून काढली जाते. ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद देत यंदा दि. ३० रोजी होणारा सामुदायिक विवाहसोहळा अकरा वर्षांत प्रथमच डॉल्बीशिवाय होणार असल्याचा निर्णय संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कासार व संचालक मडळाने घेतला आहे.आदर्की, ता. फलटण येथे भैरवनाथ उद्योग समूह व शासनाच्या शुभमंगल योजनेअंतर्गत सामुदायिक विवाहसोहळा घेतला जातो. यामध्ये नवरदेवाची सजविलेल्या ट्रॉलीतून डॉल्बीच्या दणक्यात मिरवणूक काढली जात होती. यावर्षी विवाहसोहळ्याचे हे बारावे वर्ष असून यंदा २२ विवाह पार पडणार आहेत. हा सोहळा डॉल्बीमुक्त होणार आहे. (वार्ताहर)सातारा : भुर्इंजच्या धर्तीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी डॉल्बीबंदीचा पर्याय स्वीकारावा, यासाठी ‘लोकमत’ने आवाहन केले आहे. सर्वच तालुक्यांमधून या आवाहनास सकारात्मक पाठिंबा मिळत असून अनेक गावांनी या विषयावर बैठका बोलावल्या आहेत. काही गावांनी तर निर्णयही जाहीर केला आहे. तरुणानांना अनेक अर्थांनी हलायला लावणाऱ्या डॉल्बीमुळं घरांच्या भिंतीही हादरून कमकुवत बनतात, हे वास्तव पटल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे डॉल्बीमुक्त गावासाठी एक पाऊल पुढे आली आहेत.‘लोकमत’ने डॉल्बीबंदीची लोकचळवळ निर्माण केली आहे. या चळवळीचा भाग बनून आम्ही यावर्षीपासून बाळासाहेब कासार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉल्बीमुक्त विवाहसोहळा पार पाडणार आहे. या सोहळ्यास हजारोंच्या संख्येन लोक उपस्थित असतात. अबालवद्धांना तसेच गावाला डॉल्बीच्या दुष्परिणामांना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे.- प्रकाश येवले, आदर्की बुद्रुकगुळुंब गावात डॉल्बीबंदीचा निर्णय...वाई : पुणे-बेंगलोर महामार्गावर वेळे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर गुळुंब गाव आहे. चांदक-गुळुंब ओढाजोड प्रकल्पामुळे या गावाची ओळख राज्यभर झाली आहे. राज्यपाल व अनेक मान्यवरांनी गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन येथील एकीचे व लोकसहभागाचे कौतुक केले आहे. गावात शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत. आता गावकऱ्यांनी ‘लोकमत’ने सुरु केलेल्या लोकचळवळीत सहभागी होऊन गावात डॉल्बीबंदीचा निर्णय घेतला आहे.विवाहसोहळ्याला आधुनिक स्वरूप आले आहे. हा सोहळा आनंददायी होण्यासाठी अमाप पैसे खर्च केले जातात. धूमधडाक्यात लग्न व्हावे, यासाठी डॉल्बी वाजविली जाते. मात्र, डॉल्बीच्या तालावर ठेका धरणाऱ्या तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढू लागले आहे. डॉल्बी लावली तरच लग्नाच्या वरातीत सहभागी होणार, असा हट्ट धरला जातो. लग्नाची वरात निघते तीही रात्री उशिरा अख्खं गाव झोपलं असताना. या वरातीत वधू-वर आणि डॉल्बीच्या तालावर नाचणारे काही हौशी युवक. डॉल्बीवर कर्कश आवाजातील गाणी वाजवून अख्ख्या गावाला वेठीस धरले जाते. मात्र, गावकरी निमूटपणे त्रास सहन करतात. पण... ‘लोकमत’ने सुरू केलेल्या लोकचळवळीमुळे गावागावांतील लोकांची मानसिकता बदलू लागली आहे. भुर्इंजप्रमाणेच आपलेही गाव डॉल्बीमुक्त करण्यासाठी गुळुंबच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. (वार्ताहर)लोकसहभागातून गावात आजपर्यंत अनेक चांगली कामे उभी राहिली आहेत. गाव करील ते राव काय करणार, या म्हणीप्रमाणे सर्वांनाच त्रासदायक ठरणारी डॉल्बी बंद करण्याचा निर्णय गावाने घेतला आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार आहे. - अल्पना यादव, सरपंच, गुळुंब