शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

समन्यायी पाणी संकल्पास प्रतिसाद

By admin | Updated: September 24, 2014 00:26 IST

हजारो नागरिकांचा सहभाग : वसुंधरा पाणी परिषदेसह पर्यावरण निसर्गप्रेमी संस्थांचा उपक्रम

कोल्हापूर : मी पाणी काटकसरीने जपून वापरीन, पाण्याचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेईन. माझ्या गावात, शहरात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचा, साठविण्याचा आणि जमिनीत मुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन, असा संकल्प आज, मंगळवारी हजारो नागरिकांनी केला. निमित्त होते समन्यायी पाणी वितरण संकल्पनेचे.वसुंधरा पाणी परिषद, भारतीय जलसंस्कृती मंडळ, टीक नेचर क्लब आणि विविध पर्यावरण, निसर्ग संस्थांतर्फे या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विविध ठिकाणी आज सकाळी अकरा वाजता दोन मिनिटे स्तब्ध राहून काटकसरीने पाणी वापरण्याचा संकल्प केला. वर्षातील दिवस आणि रात्र समसमान असलेला दिवस म्हणजे २३ सप्टेंबर होय. या दिवसाचे प्रतीक म्हणून जिल्ह्यात ‘समन्यायी पाणी वितरण’ या संकल्पनेचा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत दिवसभरात आपल्या सोयीनुसार अनेक नागरिकांनी आपले काम दोन मिनिटे बंद ठेवून तसेच सर्वांना सोयीस्कर अशा ठिकाणी एकत्रित येऊन शुद्ध पाण्याच्या मूलभूत हक्कांसाठी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनात त्याग केलेल्या, कष्ट सहन केलेल्या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटे उभे राहून स्तब्धता पाळली आणि त्यांनी पाणी काटकसरीने वापरण्याबाबत संकल्प केला. या उपक्रमात अनेक शाळा, जिल्हा परिषदेचे विविध विभाग सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)असा होता संकल्प....मी पाणी काटकसरीने जपून वापरीन. त्याचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेईन. माझ्या गावात, शहरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब अडविण्याचा, साठविण्याचा आणि जमिनीत मुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. त्याचे समन्यायी तत्त्वावर वितरण करण्यासाठी आणि सर्वांना पुरेसे पाणी कसे मिळेल, हे पाहण्यासाठी मी सतत जागरूक असेन. मी आवश्यक तेथे झाडे लावण्यास, ती जगविण्यास, सहकार्य आणि श्रमदान करीन. माझ्या गावातील प्रत्येकजण समृद्ध कसा होईल, माझ्या गावात एकही माणूस दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही, अशिक्षित असणार नाही, हे मी पाहीन. माझा संपूर्ण गाव आणि देश समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी मी कटिबद्ध असेन.पाणी काटकसरीने जपून वापरीन, असा संकल्प एक दिवस करून चालणार नाही; तर प्रत्येक नागरिकाने तो वर्र्षभर केला पाहिजे. हा संकल्प स्वत:पुरता मर्यादित न ठेवता सर्वांना दिला पाहिजे. या उपक्रमात जिल्ह्णातील सुमारे पाच हजार नागरिक तरी नक्कीच सहभागी झाले असतील. - प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे अध्यक्ष, भारतीय जल संस्कृती मंडळ असा होता संकल्प....मी पाणी काटकसरीने जपून वापरीन. त्याचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेईन. माझ्या गावात, शहरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब अडविण्याचा, साठविण्याचा आणि जमिनीत मुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. त्याचे समन्यायी तत्त्वावर वितरण करण्यासाठी आणि सर्वांना पुरेसे पाणी कसे मिळेल, हे पाहण्यासाठी मी सतत जागरूक असेन. मी आवश्यक तेथे झाडे लावण्यास, ती जगविण्यास, सहकार्य आणि श्रमदान करीन. माझ्या गावातील प्रत्येकजण समृद्ध कसा होईल, माझ्या गावात एकही माणूस दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही, अशिक्षित असणार नाही, हे मी पाहीन. माझा संपूर्ण गाव आणि देश समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी मी कटिबद्ध असेन.