शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बॅँक, न्यायालयाच्या कात्रीत जिल्हा बॅँक : - पीककर्ज वाटपाचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:35 IST

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यावरून जिल्हा बॅँकेची कोंडी झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने संबंधितांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले; पण थकीत खातेदाराला कर्जपुरवठा करायचा नाही,

ठळक मुद्देआदेश मानल्यास कारवाई; न मानल्यास ‘अवमान’

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यावरून जिल्हा बॅँकेची कोंडी झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने संबंधितांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले; पण थकीत खातेदाराला कर्जपुरवठा करायचा नाही, असे रिझर्व्ह बॅँकेचे निर्बंध आहेत; त्यामुळे न्यायालयाचे आदेश मानले तर रिझर्व्ह बॅँक व ‘नाबार्ड’ कारवाई करणार आणि आदेश मानले नाहीत तर न्यायालयाचा अवमान होतो, अशा कात्रीत जिल्हा बॅँक आहे.

केंद्र सरकारने २००८ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला. जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकºयांना २७९ कोटींचा लाभ झाला; पण तत्कालीन लोकप्रतिनिधींनी कर्जमंजुरीचा मुद्दा पुढे करीत कर्जमाफीत बोगसगिरी झाल्याची तक्रार ‘नाबार्ड’कडे केली होती. ‘नाबार्ड’ने तपासणी केल्यानंतर कर्जमंजुरीपेक्षा जादा वाटप केल्याचे निदर्शनास आले आणि ११२ कोटींची कर्जमाफी परत घेतली. यामध्ये ४४ हजार शेतकरी अडकल्याने ‘पात्र-अपात्र’चे प्रकरण न्यायालयात पोहोचले. तोपर्यंत जिल्हा बॅँकेने विकास संस्थांच्या खात्यावरून ही अपात्र रक्कम वसूल केल्याने संस्थापातळीवर ही थकबाकी मोठ्या प्रमाणात राहिली.

उच्च न्यायालयाने या शेतकºयांना पात्र ठरविले; पण ‘नाबार्ड’ने निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असले तरी शेतकºयांची गरज ओळखून सर्वोच्च न्यायालयाने १० लाखांपर्यंत अपात्र ठरलेल्या शेतकºयांना पूर्ववत कर्जपुरवठा करण्याचे आदेश आॅगस्ट २०१८ मध्ये दिले; पण जिल्हा बॅँकेने त्याची अंमलबजावणी केली नाही. हा मुद्दा ‘शाहू’ कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी उचलून धरल्याने हा मुद्दा येथून पुढे संवेदनशील होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन बॅँकेने केले पाहिजे, ही भूमिका शेतकºयांची आहे. शेतकºयांची निकड पाहता, कर्जपुरवठा केलाच पाहिजे.

हे जरी खरे असले तरी थकबाकीदाराला कर्जपुरवठा करायचा नाही, असे रिझर्व्ह बॅँक व ‘नाबार्ड’चे निर्बंध आहेत. त्यामुळे न्यायालयाचा आदेश मानला तर रिझर्व्ह बॅँक कारवाई करणार आणि आदेश मानला नाही तर न्यायालयाचा अवमान होतो, अशा दुहेरी संकटात जिल्हा बॅँकेचे संचालक सापडले आहेत.‘अपात्र’मधील बँकेचे २२ कोटी अडकलेअपात्र रकमेपैकी बहुतांश रक्कम जिल्हा बॅँकेने विकास संस्थांच्या चालू खात्यावरून वसूल केली; पण अद्याप त्यांचे सुमारे २२ कोटी रुपये अडकले आहेत. बॅँकेपेक्षा विकास संस्थांना याचा मोठा फटका बसला असून, जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक संस्था अनिष्ट दुराव्यात गेल्या आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक