शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

रिझर्व्ह बॅँक, न्यायालयाच्या कात्रीत जिल्हा बॅँक : - पीककर्ज वाटपाचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:35 IST

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यावरून जिल्हा बॅँकेची कोंडी झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने संबंधितांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले; पण थकीत खातेदाराला कर्जपुरवठा करायचा नाही,

ठळक मुद्देआदेश मानल्यास कारवाई; न मानल्यास ‘अवमान’

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यावरून जिल्हा बॅँकेची कोंडी झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने संबंधितांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले; पण थकीत खातेदाराला कर्जपुरवठा करायचा नाही, असे रिझर्व्ह बॅँकेचे निर्बंध आहेत; त्यामुळे न्यायालयाचे आदेश मानले तर रिझर्व्ह बॅँक व ‘नाबार्ड’ कारवाई करणार आणि आदेश मानले नाहीत तर न्यायालयाचा अवमान होतो, अशा कात्रीत जिल्हा बॅँक आहे.

केंद्र सरकारने २००८ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला. जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकºयांना २७९ कोटींचा लाभ झाला; पण तत्कालीन लोकप्रतिनिधींनी कर्जमंजुरीचा मुद्दा पुढे करीत कर्जमाफीत बोगसगिरी झाल्याची तक्रार ‘नाबार्ड’कडे केली होती. ‘नाबार्ड’ने तपासणी केल्यानंतर कर्जमंजुरीपेक्षा जादा वाटप केल्याचे निदर्शनास आले आणि ११२ कोटींची कर्जमाफी परत घेतली. यामध्ये ४४ हजार शेतकरी अडकल्याने ‘पात्र-अपात्र’चे प्रकरण न्यायालयात पोहोचले. तोपर्यंत जिल्हा बॅँकेने विकास संस्थांच्या खात्यावरून ही अपात्र रक्कम वसूल केल्याने संस्थापातळीवर ही थकबाकी मोठ्या प्रमाणात राहिली.

उच्च न्यायालयाने या शेतकºयांना पात्र ठरविले; पण ‘नाबार्ड’ने निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असले तरी शेतकºयांची गरज ओळखून सर्वोच्च न्यायालयाने १० लाखांपर्यंत अपात्र ठरलेल्या शेतकºयांना पूर्ववत कर्जपुरवठा करण्याचे आदेश आॅगस्ट २०१८ मध्ये दिले; पण जिल्हा बॅँकेने त्याची अंमलबजावणी केली नाही. हा मुद्दा ‘शाहू’ कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी उचलून धरल्याने हा मुद्दा येथून पुढे संवेदनशील होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन बॅँकेने केले पाहिजे, ही भूमिका शेतकºयांची आहे. शेतकºयांची निकड पाहता, कर्जपुरवठा केलाच पाहिजे.

हे जरी खरे असले तरी थकबाकीदाराला कर्जपुरवठा करायचा नाही, असे रिझर्व्ह बॅँक व ‘नाबार्ड’चे निर्बंध आहेत. त्यामुळे न्यायालयाचा आदेश मानला तर रिझर्व्ह बॅँक कारवाई करणार आणि आदेश मानला नाही तर न्यायालयाचा अवमान होतो, अशा दुहेरी संकटात जिल्हा बॅँकेचे संचालक सापडले आहेत.‘अपात्र’मधील बँकेचे २२ कोटी अडकलेअपात्र रकमेपैकी बहुतांश रक्कम जिल्हा बॅँकेने विकास संस्थांच्या चालू खात्यावरून वसूल केली; पण अद्याप त्यांचे सुमारे २२ कोटी रुपये अडकले आहेत. बॅँकेपेक्षा विकास संस्थांना याचा मोठा फटका बसला असून, जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक संस्था अनिष्ट दुराव्यात गेल्या आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक