शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून विहिरीचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: January 16, 2015 00:14 IST

वडगावातील रहिवासी : १७ जणांनी टप्प्याटप्याने पाच लाखांचा निधी केला संकलित

सुहास जाधव - वडगाव -वाढीव वसाहतीमध्ये पुरेसे रहिवासी झाल्याशिवाय विकासकामे करणे हे पालिकेसमोर आव्हानात्मकच असते; पण वडगाव येथील दत्तनगरातील १७ जणांनी यावर मात केली. या सर्वांनी पाच लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने संकलित करून विहिरीचे पुनरुज्जीवन केले. येथे पाणीपुरवठ्याची सोय केली. ‘एकत्र येणे म्हणजे, गती, गती म्हणजे प्रगती’ ही म्हण साकारल्याचे दिसते.
शहरात वाढीव वसाहतीमध्ये जागा खरेदी ते बांधकाम व राहण्यास जाणे हे दिव्यच असते. येथे संपूर्ण वसाहत विकसित झाल्याशिवाय रस्ते, गटर्स, दिवे, आदींची सुविधा पालिका प्रशासन करू शकत नाही. मात्र, येथे राहणाऱ्या नागरिकांना बांधकाम झाल्यानंतर खऱ्या अर्थाने घराचे सुख मिळण्यास ‘वाट’ बघावी लागते.
सध्या वडगावसह सर्वच शहरांतील वाढीव वसाहतीमध्ये असे चित्र आहे. नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्याची तरी सोय व्हावी, म्हणून पालिकेचा टँकर आठवड्यातून दोन ते तीन वेळेला येतो. इतर खर्चासाठी विविध ठिकाणांहून पाण्यासाठी भटकंती ठरलेली असते. हा नागरिकांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार, प्रयत्न करणे आवश्यक असते.
वडगाव-हातकणंगले रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दत्तनगर वसाहत आहे. ही जागा बांधकाम व्यावसायिक आनंदराव पाटील यांनी विकसित केली. येथे ९० भूखंड पाडण्यात आले. अशा वसाहतीमध्ये पाण्याची गंभीर समस्या होती. या वसाहतीमधील १७ नागरिकांनी पाणी समस्या दूर करण्यासाठी मंथन, बैठका घेतल्या. या सर्वांनी या जागेत पडिक व मुजण्याच्या मार्गावर असणाऱ्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जागामालक आनंदराव पाटील व पालिकेची परवानगी घेण्यात आली.
यासाठी सात नागरिकांनी एकत्रितपणे दहा महिने विहिरीतील गाळ उपसणे, आडव्या पारा मारणे, विहिरीभोवती संरक्षण भिंत, विहिरीवर जाळी मारणे, विद्युत कनेक्शन, पाणी उपसा मोटार, आदी कामे केली. तसेच संबंधित नोंदणीकृत नागरिकांच्या घरापर्यंत अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या. दत्तनगरातील नागरिकांच्या या प्रयत्नामुळे घरापर्यंत दररोज अर्धा तास पाणी मिळते. याचा मासिक खर्चही ८० ते ९० रुपये वीज बिलात येतो.
२९ जून २०१४ ला पाणीपुरवठ्याचे लोकार्पण झाले. येथील सर्व जाती, धर्माचे लोक गणेश उत्सवासह विविध कार्यक्रम एकत्रितपणे साजरे करतात. यामध्ये आणखी इच्छुकांनाही सहभागी करून व्याप्ती वाढवावी. त्यामुळे चांगली योजना सार्थकी लागेल. तसेच नव्याने राहण्यास येणाऱ्या नागरिकांना पाणी योजनेत सहभागी करून घ्यावे, यामुळे लोकसहभागाचा उद्देश सफल होईल.

यासाठी सात नागरिकांनी एकत्रितपणे दहा महिने विहिरीतील गाळ उपसणे, आडव्या पारा मारणे, विहिरीभोवती संरक्षण भिंत, विहिरीवर जाळी मारणे, विद्युत कनेक्शन, पाणी उपसा मोटार, आदी कामे केली. तसेच संबंधित नोंदणीकृत नागरिकांच्या घरापर्यंत अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या. दत्तनगरातील नागरिकांच्या या प्रयत्नामुळे घरापर्यंत दररोज अर्धा तास पाणी मिळते.