शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
4
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
5
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
6
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
7
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
8
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
9
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
10
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
11
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
12
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
13
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
14
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
15
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
16
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
17
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
18
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
19
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
20
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

रानमेवाच ठरतोय ‘त्यांच्या’ जगण्याचा आधार...

By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST

जंगलातून भटकंती : रानमेवा विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून वर्षभरासाठी संसारोपयोगी वस्तूंची साठवणूक

राजाराम कांबळे - मलकापूरवर्षातून दोन महिन्यांसाठी येणाऱ्या रानमेव्यांची डोळ्यात आसवं आणून वाट बघायची आणि त्या दोन महिन्यांत जेवढा जंगलातील रानमेवा पदरात पाडून घेता येईल तेवढा घ्यायचा, त्याची विक्री करून मिळणाऱ्या चार पैशांतून वर्षभरासाठी संसाराला लागणाऱ्या वस्तूंची साठवणूक करायची. रानमेवा धनगर बांधवांच्या जगण्याचा आधार ठरत आहे.चालूवर्षी अवकाळी पाऊस, वादळी वारा, आभाळ येणे, असे चमत्कारिक प्रकार घडल्याने त्याचा रानमेव्यांवर परिणाम झाला आहे. परिणामी करवंद, आळू, जांभूळ, काजू, आंबा या फळांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या धनगर बांधवांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. शाहूवाडी तालुक्यात ३०१६५.८१.२० हेक्टर एवढी वनखात्याची जमीन आहे. या जमिनीवर विशाळगड, चांदोली, अणुस्कुरा, आंबा, कांडवण, गिरगाव, आदी ठिकाणी मोठी जंगले वसली आहेत. या जंगलाशेजारी तालुक्यातील शंभर धनगरवाडे वसले आहेत. हे जंगल वेगवेगळ््या वृक्षांनी व्यापले आहे.करवंदे, जांभळे, काजू, नेर्ली, आळू, रतांबे, तोंदली, शेबत्याळ, तमालपत्री, औषधी वनस्पती, आदी रानमेव्यांची विपुल प्रमाणात भर पडत आहे. मोठ्या जंगलांमुळे जंगलातील गवे, डुकरे यांच्या अतिक्रमणामुळे ऊसपीक, भात, नाचना, मका, वरणा, सोयबीन या पिकांची नासाडी केली जात आहे. त्यामुळे जंगलव्याप्त भागात राहणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे ऊन, वारा यांची तमा न बाळगता त्यांच्याशी दोन हात करताना त्यांच्या नाकीनऊ येते. रानमेवाच त्यांच्यासाठी मोठा आधार ठरत आहे. दोन महिन्यांत जेवढा रानमेवा विक्री करून पैसे मिळविता येतील, तेवढे मिळवून वर्षाची पोटगी केली जाते. त्याचबरोबर आर्थिक गणिते मांडली जातात. संपूर्ण कुटुंब पहाटे पाच वाजल्यांपासून सायंकाळी पाचवाजेपर्यंत रानमेवा गोळा करीत असते. शाहूवाडी तालुक्यात उदगिरी, शित्तूरवारूण, आळतूर, येळवण जुगाई, करंजफेण, आंबा परिसरात मोठ्या प्रमाणात धनगर बांधव वसले आहेत. जंगलातून मिळणाऱ्या वनौषधी वनस्पतींपासून ते जंगली रानमेवा विक्री करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. धनगर बांधव आपला जीव धोक्यात घालून आंबा, फणस, काजू, आदी माडावर चढायचे, काही मिळेल ते झोपडीत घेऊन यायचे आणि ५० ते ६० कि. मी. अंतरापर्यंत पायी चालत जाऊन बाजारपेठेत रानमेवा विक्री केला जातो. त्यातून मिळणाऱ्या चार पैशांतून संसाराला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली जाते.