शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सरकारला ४६० व्होल्टचा झटका दिल्याशिवाय स्वस्थ नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 11:22 IST

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीला या वयात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते, ही ...

ठळक मुद्देसरकारला ४६० व्होल्टचा झटका दिल्याशिवाय स्वस्थ नाही : राजू शेट्टी दडपशाही कराल तर याद राखा : सतेज पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीला या वयात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते, ही सरकारच्यादृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. लबाडांचे दिवस भरले असून, सरकारला ४६० व्होल्टचा झटका दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

आंदोलन होऊच नये म्हणून गेले दोन दिवस सरकारच्यावतीने दडपशाही सुरू असल्याचे सांगत आत टाकायचे झाल्यास आमदार म्हणून पहिल्यांदा आम्हाला टाका, शेतकऱ्यांवर दडपशाही कराल तर याद राखा, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या सवलतीच्या नावाखाली महावितरण कंपनी सरकारला लुटत आहे, तरीही आमच्या नावावर कोट्यवधीची थकबाकी दाखविली जाते. एकदा घोंगड्यावर बसून हिशोब करूयाच. शेतकऱ्यांना फसवाल तर आता गप्प बसणार नाही. रस्त्यावर उतरून एका एकाला तुडविल्याशिवाय सोडणार नाही.

आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप सरकारने स्मारकांची आश्वासने देऊन छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना फसवले तिथे शेतकऱ्यांचे काय? आताही ते आश्वासन देतील, पण विश्वास ठेवायला नको.प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, सरकारने यापूर्वी नुसते आश्वासन दिले होते; पण अध्यादेश म्हणजे ब्रह्मवाक्य असल्याने तो काढण्यासाठी आमचा आग्रह आहे. तारखेचा घोळ होत पत्र वाईवरून कोल्हापुरात आले असेल तरी ते कोल्हापुरात आले हे खरे गमक आहे. हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने मंत्र्यांनी पत्र दिल्याने त्यांना आश्वासन पाळावेच लागेल.कारखानदारांनीही जरा तुरुंगात यावेसाखर कारखान्यांवरील आंदोलनामुळे आमच्यावर अगोदरच सर्व कलमे लागल्याने सरकारच्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही. कारखानदारांनी जरा आमच्यासोबत तुरुंगात यावे म्हणजे तिथेच त्यांची चांगली चौकशी होईल, असा टोला शेट्टी यांनी हाणला.

बालहट्टाप्रमाणे मंत्री हट्टही पुरविलाघरी आल्यानंतर तुमच्या मागण्या काय? अशी विचारणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावर, गेल्या साडे चार वर्षांतील निवेदनांवर नुसती नजर टाकली असती तर मागण्या पाठ झाल्या असत्या, असे सांगितले. स्त्रीहट्ट, बालहट्टाप्रमाणे मंत्र्यांचा हट्टही असतो, त्यानुसार त्यांना नवीन पत्र करून दिल्याचा चिमटा प्रा. पाटील यांनी काढला.

२९ फेबु्वारी म्हटले नाही हे नशीबचशासकीय अध्यादेश काढण्याच्या तारखांवरून प्रा. पाटील यांनी मंत्री पाटील यांचे चांगलेच चिमटे काढले. मंत्री पाटील यांनी पहिल्यांदा २८ फेबु्वारीचे पत्र दिले. त्यांनी २९ फेबु्वारी तारीख दिली नाही, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कारण त्यासाठी आणखी दीड वर्षे वाट पाहावी लागली असती, अशी टीका प्रा. पाटील यांनी केल्यानंतर एकच हशा पिकला.

संपतरावांकडून कारखानदारांचा चिमटावीज दरवाढविरोधातील आंदोलनात साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिले, पण त्यांनी एफआरपी द्यायची नाही, असे ठरवून २३०० रुपये उसाला दिले. खरेच ते शेतकऱ्यांच्या बाजूने असतील तर सरकारची देणी प्रलंबित ठेवून एफआरपी द्यावी, असा टोला संपतराव पवार यांनी हाणला, त्यास शेतकऱ्यांनी घोषणा देऊन पाठिंबा दिला.

आपत्कालीन पथक तैनातपंचगंगा पुलानजीकच दर्ग्यासमोर आंदोलनकर्ते ठिय्या मारून होते. येथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पंचगंगा नदीपात्रात आपत्कालीन पथक तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

दादा, गाजर नको ‘एफआरपी’चे बोलामंत्री चंद्रकांत पाटील आंदोलनस्थळी आल्यानंतर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी ‘एकच गट्टी राजू शेट्टी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. मंत्री पाटील आश्वासनाचे पत्र वाचून दाखवित असताना कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. ‘दादा गाजर नको, एफआरपीचे बोला’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. एन. डी. पाटील यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

शिरोली ग्रामपंचायतीचे सहकार्यआंदोलनस्थळी ट्रॉलीतच स्टेज उभे केले होते. त्याचबरोबर खुर्च्या, शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था शिरोली ग्रामपंचायतीने केली होती. यासाठी सरपंच शशिकांत खवरे, सदस्य अविनाश कोळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, जोतिराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, उत्तम पाटील, राजू सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील