शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

राजमाता जिजाऊ ब्रिगेडचा नव्या मराठा पक्षाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:57 AM

महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाचा आपल्या सोईसाठी वापर करून घेतला आहे. हा वापर पुढे होऊ नये, याकरिता नव्याने स्थापन होणाऱ्या मराठा समाजाच्या पक्षाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देराजमाता जिजाऊ ब्रिगेडचा नव्या मराठा पक्षाला पाठिंबाशिवाजी मंदिरात झालेल्या मेळाव्यात एकमताने निर्णय

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाचा आपल्या सोईसाठी वापर करून घेतला आहे. हा वापर पुढे होऊ नये, याकरिता नव्याने स्थापन होणाऱ्या मराठा समाजाच्या पक्षाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. हा निर्णय राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात झालेल्या मेळाव्यात एकमताने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी भुयेवाडीच्या माजी सरपंच राणीताई पाटील होत्या.नव्याने स्थापन होत असलेल्या मराठा समाजाच्या पक्षाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शिवाजी मंदिरात आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी तीनशेहून अधिक महिलांनी जिल्हाभरातून उपस्थिती लावली होती. राज्यातील सर्वच पक्षांनी केवळ मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला आहे. त्यातून समाजाला मागास ठेवण्याचे काम या सर्वच पक्षांनी केले आहे. त्यामुळे नव्याने मराठा समाजाचा पक्ष निर्माण होत आहे. त्यास जाहीर पाठिंबा व्यक्त करण्याचा ठराव पाटील यांनी मांडला. त्यास ब्रिगेडच्या सर्वच महिला पदाधिकारी, सदस्यांनी हात उंचावून जाहीर पाठिंबा व्यक्त केला.जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्षा सुधा सरनाईक यांनी आभार, तर रूपाली मोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुवर्णा मिठारी, लता जगताप, शीतल कुराडे, सरिता सासने, स्मिता हराळे, दीपाली लोंढे, छाया जाधव, रेश्मा पोवार, पूजा पाटील, अनिता जाधव, स्नेहल कुराडे, रूपाली कुराडे, साक्षी अतिग्रे, सारिका मांगले, शारदा आगळे, माई वाडेकर, अमृता पाटील, सीमा भोसले, आदी उपस्थित होत्या. 

 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूरWomenमहिलाPoliticsराजकारण