शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कच्चा मालाच्या दरवाढीने उद्योगांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 11:29 IST

पिग आर्यन, कॉपर, निकल, आदी कच्चा मालाच्या दरवाढीने नवी अडचण उद्योगांसमोर उभारली आहे. गेल्या दीड वर्षांत कच्च्या मालाचे दर १५ ते १५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

संतोष मिठारीकोल्हापूर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती आणि आव्हानांचा सामना करत कोल्हापुरातील उद्योगचक्र सुरू आहे. कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव, ऑर्डर्सचे वाढलेले प्रमाण, मनुष्यबळाची उपलब्धता, आदी पूरक घटकांच्या सहाय्याने फौंड्री हब असलेले औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येण्यासाठी धडपडत आहे. मात्र, पिग आर्यन, कॉपर, निकल, आदी कच्चा मालाच्या दरवाढीने नवी अडचण उद्योगांसमोर उभारली आहे. गेल्या दीड वर्षांत कच्च्या मालाचे दर १५ ते १५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

ऑर्डर्सचे प्रमाण वाढल्याने हातात काम असूनही उद्योजकांना गती घेता येत नाही. जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग पूर्वपदावर येणे आवश्यक आहे. ते लक्षात घेऊन कच्चा मालाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने आणि लवकर लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी उद्योजकांतून होत आहे. जगातील विविध देशांनी चीनवर अलिखित बहिष्कार टाकल्याने कास्टिंगसाठी कोल्हापुरातील फौंड्रीच्या ऑर्डर्स सरासरी १५ टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे साहजिकच औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांचे काम वाढले. जुलै-ऑगस्टच्या तुलनेत विचार करता कारखान्यांमधील काम ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत पूर्वपदावर आले आहे. उद्योजक काय सांगतात?

ऑर्डर्स चांगल्या आहेत. मात्र, कच्चा मालाचे वाढते दर अडचणीचे ठरत आहेत. सध्या उत्पादनाची क्षमता बहुतांश कारखाने दोन ते तीन शिफ्टमध्ये सुरू आहेत. औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येत आहे.  -उत्तम पाटील, शिरोली एमआयडीसी

कच्चा मालाचे दर वाढत असल्याने उद्योगांच्या भांडवलावर ताण पडत आहे. दिवाळीनंतर थोडासा स्लोडाऊन दिसत आहे. उद्योगचक्राची गती वाढण्यासाठी कच्चा मालाचे दर कमी होणे खूप आवश्यक आहे. -दिनशे बुधले, सचिव, कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे काम निश्चितपणे वाढले आहे. ते पूर्ण करण्यात कच्चा मालाच्या वाढणाऱ्या दराचे आव्हान आहे. ते दूर झाल्यास कामाची गती आणखी वाढणार आहे. -गोरख माळी, अध्यक्ष, मॅकजुलै २०२२ पर्यंतच्या कामाच्या ऑर्डर्स जिल्ह्यातील विविध कारखान्यांना मिळाल्या आहेत. मात्र, महिन्यागणिक पिग आर्यन, स्क्रॅप, आदी कच्चा मालाचे दर वाढत आहेत. त्यामुळे उद्योजकांची अडचण होत आहे. कच्चा मालाचे दर नियंत्रणात ठेवण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने लवकर लक्ष देणे आवश्यक आहे. - श्रीकांत पोतनीस, गोकूळ शिरगाव एमआयडीसी

 

असे वाढले कच्चा मालाचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

कच्चा माल                                    डिसेंबर २०१९             डिसेंबर २०२०                         नोव्हेंबर २०२१पिग आर्यन                                     ३०.४७                         ३३.५५                                                 ५०

सीआय स्क्रॅप                                    ३०.५०                         ३८                                                 ४८.५०एमएस स्क्रॅप                                     २६                              ३७                                                 ४७.५०

कोळसा                                            ३३.५०                           ३३                                                  ४९फेरो सिलीकॉन                                 १३०                               -                                                    २२०

फेरो मॅन्गेनिज                                  ८८                                 -                                                   २४०

तर, फौंड्री उद्योग बंद पडणार

-फौंड्री उद्योग सुरू झाला असला, तरी मोठ्या समस्यांना तोंड देत आहे. कामे कमी झाली असून त्यातही आठवड्यातील तीन दिवस बंद ठेवावे लागत आहेत. पिग आर्यन, कोळसा, सिलीकाॅन, मॅग्नीज, सीआय स्क्रॅप मटेरियलचे दर दुप्पट झाले आहेत. -कच्चा मालाच्या वाढीव किमतीप्रमाणे मोठ्या कंपन्या वाढीव दर देत नाहीत. त्यामुळे कोल्हापुरातील फौंड्री उद्योजक हा नुसता हमालीच करत आहे. कच्च्या मालातील दरवाढ अशीच सुरू राहिली, तर फौंड्री उद्योग बंद पडेल. -केंद्र, राज्य शासनाने, लोकप्रतिनिधींनी यात वेळीच लक्ष घालून दरवाढ कमी करण्यासाठी तातडीने उपाय करावेत, अशी मागणी फौंड्री उद्योजक हिंदूराव कामते यांनी केली.

दरमहा लागतो ८० हजार टन कच्चा माल

जिल्ह्यात दरमहा ७५ हजार टन कास्टिंगचे उत्पादन होते. त्यासाठी पिग आर्यन, स्क्रॅॅप, कॉपर, निकल, फेरोऑलॉई, फेरोसिलिकॉन असा सुमारे ८० हजार टन कच्चा माल लागतो. त्याची एकूण किंमत सुमारे ८०० कोटींपर्यंत जाते. या कच्च्या मालाचा पुरवठा मुंबई, पुणे, जालना, नागपूर, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम येथून होतो.

आकडेवारी दृष्टिक्षेपातकोल्हापूर विभागातील फौंड्रींची संख्या : ३००कामगारांची संख्या : दीड लाखदरमहा उत्पादन : ७५ हजार टनवार्षिक उलाढाल : एक हजार कोटी

औद्योगिक वसाहतनिहाय उद्योगांची संख्याशिवाजी उद्यमनगर : ८५०शिरोली            : १०००गोकुळ शिरगाव : ८००  कागल हातकणंगले : ४५०         

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या