शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

जनता घरात... कोरोना योद्धे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून बचाव करण्याकरिता जनतेला घरात बसवून शहरातील पोलिसांसह अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी कोरोनाशी रस्त्यावरची लढाई लढत ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गापासून बचाव करण्याकरिता जनतेला घरात बसवून शहरातील पोलिसांसह अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी कोरोनाशी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. कधी ढगाळ, तर कधी पावसाळी वातावरण, कधी कमालीचा उष्मा, तर कधी जोराचे वारे, पाऊस सोसत जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन हे कोरोना योद्धे अव्याहतपणे राबत आहेत.

कोल्हापूर शहराची जवळपास साडेपाच लाख जनता गेल्या काही दिवसांपासून घरात थांबली आहे, रविवारपासून तर कडक लॉकडाऊन झाल्यामुळे अनेकांनी घराचा उंबरा ओलांडलेला नाही. अगदीच प्रसंग आला तर दवाखान्यात जाण्याकरिताच लोक बाहेर पडत आहेत. बाकी संपूर्ण वेळ स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. जनतेच्या दृष्टीने हा कठीण काळ असला तरी अशा कठीण काळातही काही हात जनतेच्या सोयीकरिता राबत आहेत.

कोरोनाची भीती धुडकावून लावत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून काम करत आहेत. जनता घरात असताना त्यांची नागरी सुविधाअभावी गैरसोय होऊ नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. कोरोनासारख्या महामारीत घराचा परिसर, गल्ली, चौक, मुख्य रस्ते स्वच्छ करण्याचे काम महानगरपालिकेतील आरोग्य विभाग करत आहे.

शहर स्वच्छता करण्याच्या कामात १९०० सफाई व झाडू कामगार, १६ आरोग्य निरीक्षक, चार विभागीय निरीक्षक व एक मुख्य निरीक्षक सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत राबताना दिसत आहेत. रस्ते स्वच्छ करणे, कचरा उठाव करणे, कंटेनर साफ करणे आणि उचललेला सर्व कचरा डेपोवर जाऊन टाकणे यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेने मास्क, सॅनिटायझर, साबण, हँडग्लोव्हज दिले आहेत. ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांना तर गमबूटसुद्धा दिले आहेत.

दोन दिवसांपूर्वी शहर आणि जिल्ह्यात वादळी वारे तसेच जाेराचा पाऊस झाला. त्यावेळी अनेक ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या विजेच्या तारावर पडल्या. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. शहरात अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन भरपावसात कामे करत विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिका लाईट शाखेचे कर्मचारीही या पावसात रस्त्यावरील विद्युत पुरवठा कसा सुरळीत राहील यासाठी धडपडत होते.

शहरात कडकडीत लॉकडाऊनमुळे सर्व काही थांबले असताना नियमित पाणीपुरवठा मात्र ठरलेल्या वेळेत होत आहे. रात्री दहा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत शहरातील पाण्याच्या टाक्या भरून घेण्यापासून ते प्रत्येक घरात वेळेवर पाणी कसे पोहोचेल यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सुमारे तीनशेहून अधिक कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यामध्ये पाणी सोडबंद करणाऱ्या चावीवाल्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोना योद्धे रस्त्यावरची लढाई करत आहेत म्हणून जनतेला सर्व सुविधा मिळत आहेत.

(फोटो देत आहे)