शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मूल्यशिक्षण आवश्यक : ज्योती शेट्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 2:37 PM

केवळ कायदे केले म्हणून हा प्रश्न निकालात निघेल, असे नाही. यासाठी कुटुंबापासून त्याची सुरुवात होणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी असा भेद करणे सर्वप्रथम थांबले पाहिजे

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील व्याख्यान

कोल्हापूर : महिलांवर होणारे अत्याचार चिंताजनक आहेत. केवळ कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही. कायद्याबरोबरच कुटुंबातील संस्कार आणि मूल्यशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिलांसंदर्भातील कायद्याच्या अभ्यासक ज्योती शेट्ये यांनी केले.शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्यावतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी ‘महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे’ या विषयावर मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. निशा पवार होत्या. ज्योती शेट्ये म्हणाल्या, महिलांना कायद्याचे संरक्षक कवच आहे. महिला व मुलींवरील अत्याचार थांबावेत यासाठी महाविद्यालये, विद्यापीठे तसेच अन्य संस्थांमध्येही अनेक उपाययोजना केल्या आहेत. एवढे करूनही समाजात महिला असुरक्षित आहेत. केवळ कायदे केले म्हणून हा प्रश्न निकालात निघेल, असे नाही. यासाठी कुटुंबापासून त्याची सुरुवात होणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी असा भेद करणे सर्वप्रथम थांबले पाहिजे

मुलीला समान दर्जा मिळत नाही, तोवर या प्रश्नाची तीव्रता कमी होणार नाही. महिलांना आदराचे स्थान मिळवून देण्यासाठी कायद्यापेक्षा मूल्यशिक्षण प्रभावी भूमिका बजावू शकेल. यासाठी प्रत्येक टप्प्यावर शिक्षणव्यवस्थेत मूल्यशिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमास डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ