शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

प्रायोगिक तत्त्वावर उचगाव, मुडशिंगी, कळंबा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:47 IST

पंचगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर तसेच कळंबा ते मोरेवाडी या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.

ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषण संदर्भातील बैठकीत निर्णय प्राधिकरणातील गावांमध्ये कचऱ्यासाठी क्लस्टर उभारणार

कोल्हापूर : पंचगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर तसेच कळंबा ते मोरेवाडी या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर हे काम करून त्यानंतर ग्रामीण भागातील नाल्यांवर असे प्रकल्प उभारण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. तसेच कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या गावात कचऱ्यासाठी क्लस्टर करावे, असेही निर्देश प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.पंचगंगा प्रदूषणासंदर्भात बैठकीसाठी उद्या, गुरुवारी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे दौऱ्यांवर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषद, कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरण, महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल होते. प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरणचे अधिकारी शिवराज पाटील, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, आदींची होती.अमन मित्तल म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदीकाठावरील गावांमधून येणारे पाणी थांबविले पाहिजे. यासाठी जिल्हा परिषद व प्राधिकरणाकडून हवे ते सहकार्य केले जाईल. तसेच, गावातून येणारे सांडपाणी गावातच शुद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

यामध्ये सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर व कळंबा ते मोरेवाडीमध्ये सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी अधिकारी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतील. त्यानंतर योग्य ठिकाणी हा प्रकल्प उभारला जाईल.

यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यापैकी दोन जागांवर सांडपाणी प्रकल्प उभारला तर लोकांना याची माहिती पटवून देता येणार आहे. त्यामुळे गावागावात होणाऱ्या सांडपाण्याकडे लोक गांभीर्याने बघायला लागतील आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.दरम्यान, तेरवाड बंधाऱ्यावर वारंवार मासे मृत होत आहेत. या ठिकाणी पाणी अडवले जाते. हे पाणी बंधाऱ्याच्या क्षमतेपक्षा १६ टक्के पाणी प्रवाहीत केले पाहिजे. तरच प्रदूषणाला आळा बसेल असे चित्र आहे. त्यामुळे हे पाणी प्रवाहित करण्याबाबतही निर्णय झाला आहे. इचलकरंजी येथील प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी असलेल्या पूर्वीच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे यावेळी ठरले.

प्राधिकरणच्या गावांत कचऱ्यासाठी क्लस्टरकोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या गावातील कचऱ्यासाठी क्लस्टर तयार करावेत, त्यासाठी गावनिहाय, कॉलनीनिहाय जागानिश्चित करावी, असे निर्देश प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. 

 

टॅग्स :pollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूर