शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

थकीत विजेच्या बिलासाठी वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

सदाशिव मोरे। आजरा : सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी विजेची बिले थकीत असणा-यांचे वीज कनेक्शन बंद केले जात आहे. आजरा ...

सदाशिव मोरे।

आजरा : सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी विजेची बिले थकीत असणा-यांचे वीज कनेक्शन बंद केले जात आहे. आजरा तालुक्यातील १२२ ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद केले आहे. ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईटची बिलेही थकीत असून त्यांचाही विद्युतपुरवठा खंडित केला जाणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून आजरा तालुक्यातील विजेची बिले कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात थकीत आहेत.

लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. शेतीमालासह काजूला दरही नाही. शेतातील पिकांचे हत्ती, गव्यास जंगली प्राण्यांकडून नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडे विजेची बिले भरण्यासाठी पैसे नाहीत.

मध्यंतरी शासनाकडून वीजबिल माफ करणार असल्याची चर्चा होती. मात्र तीही फोल ठरली आहे. नागरिकांकडे पैसेच नसल्याने वीजबिल भरायचे कशाने हा प्रश्न चिन्ह आहे. वीज वितरणचे कर्मचारी दररोज थकबाकीदारांच्या दारात जावून बिलाची मागणी करीत आहेत. मात्र थकीत बिले नागरिक भरू शकत नाहीत.

तालुक्यातील १२९४० घरगुती ग्राहकांकडून १ कोटी ४२ लाख, व्यापारी ८३७ ग्राहकांकडून ४२ लाख, औद्योगिकचे ३६० ग्राहकांकडून १ कोटी ६० लाख, पोल्ट्रीधारक २७० ग्राहकांकडून २२ लाख ५४ हजार, सरकारी कार्यालयातील ८ लाख ५७ हजार रुपये, पाणी पुरवठ्याचे ४५ ग्रामपंचायतीकडून १ कोटी २४ लाख तर ग्रामपंचायतीचे स्टेट लाईटकडून १५० ग्राहकांचे ३ कोटी ७८ लाख असे एकूण ८ कोटी ७७ लाख ११ हजारांची रक्कम वीज वितरणची थकीत आहे.

थकीत बिल वसुलीसाठी वीज वितरणकडून हप्ते पाडून दिले आहेत. तरीही नागरिक अशी रक्कम भरत नसल्याने वीजवितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू केला आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतीची करवसुली झाली नसल्यामुळे वीज वितरणचे पाणी पुरवठा व स्टेट लाईटची बिले भरू शकत नाहीत.

सध्या वीज वितरण कंपनी थकीत बिलावर व्याजाची आकारणी सुरू केली आहे. व्याजाची आकारणी ग्राहकांना न परवडणारी आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने अनेक नागरिक धावपळ करून आपली थकीत रक्कम भरणा करीत आहेत.

चौकट :

ग्रामविकास खात्याकडून स्ट्रीट लाईटसाठी अनुदानच नाही

गावा-गावातील स्टेट लाईटचे बिल भरण्यासाठी यापूर्वी ग्रामविकास विभागाकडून पन्नास टक्के रक्कम दिली जात होती. उर्वरित ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडून घातली जात होती. धंदे मात्र गेली दोन वर्षे स्ट्रीट लाईटच्या बिलासाठी ग्रामविकास खात्याकडून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींची स्ट्रीट लाईटची बिले थकीत आहेत.