शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

थकीत विजेच्या बिलासाठी वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

सदाशिव मोरे। आजरा : सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी विजेची बिले थकीत असणा-यांचे वीज कनेक्शन बंद केले जात आहे. आजरा ...

सदाशिव मोरे।

आजरा : सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी विजेची बिले थकीत असणा-यांचे वीज कनेक्शन बंद केले जात आहे. आजरा तालुक्यातील १२२ ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद केले आहे. ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईटची बिलेही थकीत असून त्यांचाही विद्युतपुरवठा खंडित केला जाणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून आजरा तालुक्यातील विजेची बिले कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात थकीत आहेत.

लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. शेतीमालासह काजूला दरही नाही. शेतातील पिकांचे हत्ती, गव्यास जंगली प्राण्यांकडून नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडे विजेची बिले भरण्यासाठी पैसे नाहीत.

मध्यंतरी शासनाकडून वीजबिल माफ करणार असल्याची चर्चा होती. मात्र तीही फोल ठरली आहे. नागरिकांकडे पैसेच नसल्याने वीजबिल भरायचे कशाने हा प्रश्न चिन्ह आहे. वीज वितरणचे कर्मचारी दररोज थकबाकीदारांच्या दारात जावून बिलाची मागणी करीत आहेत. मात्र थकीत बिले नागरिक भरू शकत नाहीत.

तालुक्यातील १२९४० घरगुती ग्राहकांकडून १ कोटी ४२ लाख, व्यापारी ८३७ ग्राहकांकडून ४२ लाख, औद्योगिकचे ३६० ग्राहकांकडून १ कोटी ६० लाख, पोल्ट्रीधारक २७० ग्राहकांकडून २२ लाख ५४ हजार, सरकारी कार्यालयातील ८ लाख ५७ हजार रुपये, पाणी पुरवठ्याचे ४५ ग्रामपंचायतीकडून १ कोटी २४ लाख तर ग्रामपंचायतीचे स्टेट लाईटकडून १५० ग्राहकांचे ३ कोटी ७८ लाख असे एकूण ८ कोटी ७७ लाख ११ हजारांची रक्कम वीज वितरणची थकीत आहे.

थकीत बिल वसुलीसाठी वीज वितरणकडून हप्ते पाडून दिले आहेत. तरीही नागरिक अशी रक्कम भरत नसल्याने वीजवितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू केला आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतीची करवसुली झाली नसल्यामुळे वीज वितरणचे पाणी पुरवठा व स्टेट लाईटची बिले भरू शकत नाहीत.

सध्या वीज वितरण कंपनी थकीत बिलावर व्याजाची आकारणी सुरू केली आहे. व्याजाची आकारणी ग्राहकांना न परवडणारी आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने अनेक नागरिक धावपळ करून आपली थकीत रक्कम भरणा करीत आहेत.

चौकट :

ग्रामविकास खात्याकडून स्ट्रीट लाईटसाठी अनुदानच नाही

गावा-गावातील स्टेट लाईटचे बिल भरण्यासाठी यापूर्वी ग्रामविकास विभागाकडून पन्नास टक्के रक्कम दिली जात होती. उर्वरित ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडून घातली जात होती. धंदे मात्र गेली दोन वर्षे स्ट्रीट लाईटच्या बिलासाठी ग्रामविकास खात्याकडून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींची स्ट्रीट लाईटची बिले थकीत आहेत.