शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नदीतून काढलेल्या जलपर्णींचे ढीग उचला; अन्यथा पालिकेच्या दारात टाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे एखाद्या मैदानासारखे दृश्य निर्माण झाले आहे. शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे एखाद्या मैदानासारखे दृश्य निर्माण झाले आहे. शहरातील सामाजिक संघटना आणि नगरपालिकेने जलपर्णी हटविण्याची मोहीम हाती घेतली. परंतु गेल्या चार दिवसांपासून काढलेल्या जलपर्णींचे ढीग काठावर तसेच साचून राहिले आहेत. त्यामुळे नव्याने काढल्या जाणाऱ्या जलपर्णी टाकण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या जलपर्णींचे ढीग ताबडतोब हलवावेत; अन्यथा पालिकेच्या प्रवेशद्वारात जलपर्णी टाकू, असा इशारा पै. अमृत भोसले यांनी दिला.

पंचगंगा नदीपात्रात प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. त्यामुळे पै. भोसले यांनी व्यंकोबा मैदान येथील पैलवानांना तसेच आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जलपर्णी काढण्याची मोहीम सुरू केली. त्यानंतर दोन दिवसांनी नगरपालिकेला जाग आली. त्यांनीही यांत्रिक बोटीसह काही मनुष्यबळ दिले. या माध्यमातून काढण्यात आलेल्या जलपर्णी घाटावरच ढीग मारून ठेवल्या आहेत. त्या नियमित उचलल्या असत्या, तर कुजल्यामुळे सुटणारी दुर्गंधी तसेच नवीन काढलेल्या जलपर्णी टाकण्यासाठी जागा मिळाली असती. नगरपालिकेला तेवढेही कष्ट घेण्याची तसदी नको आहे का? असा संतप्त सवाल करीत जलपर्णी काढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच भोसले यांनी जलपर्णी नगरपालिकेच्या दारात टाकण्याचा इशारा दिला.

चौकट 'अर्थ' नसल्याने दुर्लक्ष

प्रत्येक कामात काही 'अर्थ' आहे का, हे शोधून काम करणाऱ्या नगरपालिकेच्या 'कारभाऱ्यां'ना या जलपर्णी काढून टाकण्याच्या कामात काहीच 'अर्थ' नसल्याचे वाटल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे का, अशी खरमरीत टीकाही सोशल मीडियावर सुरू आहे.