शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

फक्त १०२ प्रवाशी-एस. टी. सुरू होऊन अल्प प्रतिसाद -जिल्हाअंतर्गत  २०८० किलोमीटर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:39 PM

प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करूनच एस.टी. धावत आहे.

ठळक मुद्देप्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारपासून जिल्हाअंतर्गत एस. टी. सेवा पुन्हा सुरू झाली. नागरिकांनी प्रवास करणे टाळल्याने रविवारी दुपारपर्यंत फक्त १०२ प्रवाशांनी एस.टी.ने प्रवास केला. काही मार्गांवर प्रवासीच नसल्याने एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली.कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली एस.टी. पुन्हा एकदा रस्त्यांवर दिसू लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा अंतर्गत एस.टी. बससेवा सुरू झाली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने या बससेवेसाठी काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून), प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करूनच एस.टी. धावत आहे.इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर अधिक प्रवासीइचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर सर्वाधिक म्हणजे ३५ प्रवाशांनी प्रवास केला. कागल-रंकाळा, कागल-हुपरी यांसह जयसिंगपूर, रंकाळा-हुपरी, मलकापूर, गडहिंग्लज-कोल्हापूर मार्गावर वाहतूक सुरू होती. मात्र या गाड्यांनाही अल्प प्रतिसाद मिळाला. राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, गारगोटी या आगारांतून एकही गाडी बाहेर पडली नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरstate transportएसटी