नृसिंहवाडी: दक्षिणद्वार सोहळ्याची दत्त भक्तांना प्रतीक्षा; पाणी स्थिर राहिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:28 IST2025-06-22T17:21:07+5:302025-06-22T17:28:35+5:30
कृष्णा, पंचगंगा नदीचे पाणी पातळी स्थिर, चालू महिन्यात दोन वेळा दक्षिणद्वार सोहळ्याची हुलकावणी, दक्षिण द्वार सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांची निराशा.

नृसिंहवाडी: दक्षिणद्वार सोहळ्याची दत्त भक्तांना प्रतीक्षा; पाणी स्थिर राहिले...
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी हे दत्त मंदिर महाराष्ट्राचा अनेक राज्यात प्रसिद्ध आहे येथील दरवर्षी पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी पातळीत वाढ होऊन येथे दक्षिणदार सोहळा संपन्न होतो. येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते. जेव्हा कृष्णा नदीचे पाणी वाढते, तेव्हा हे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून मुख्य गाभार्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात.
या वर्षी दि. 26 मे, 17 जून व आज दि. 22 जून रोजी मंदिराजवळ आलेले कृष्णा नदीचे पाणी कमी झाल्याने येथील दक्षिणद्वार सोहळ्यास हुलकावणी मिळाली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ़ होत असल्याने तसेच शनिवार व सुट्टीचा वार रविवार व एकादशीचे धार्मिक महत्व असल्याने दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करण्यासाठी ठीक ठिकाणच्या परिसरातून भाविक नृसिंहवाडी येथे आले होते. मात्र पावसाची उघडीप मिळाल्याने येथील पाणी पातळी स्थीर झाली व दक्षिणद्वार सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना परतावे लागले.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी पातळी वाढली की दक्षिणद्वार सोहळा संपन्न होतो. #Nrusinhwadi#Kolhapurpic.twitter.com/Wt2qExjg64
दक्षिणद्वार सोहळा या योगायोगच- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. श्री चरणावरून येण्याऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केल्याने पापांचा ह्रास होऊन पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात मात्र नदीची पाणी पातळी वाढणे, कमी होणे हे निसर्गावर अवलंबून असल्याने व मंदिराच्या गर्भद्वाराची चौकट एक फूट उंचीची असल्याने हा सोहळा कधी सुरू होईल व संपेल हे नक्की सांगता येत नाही यात स्नान करायला मिळणे हा योगायोगच असतो. हा सोहळा पाणी वाढताना व उतरताना असा दोन वेळा होतो.