शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदर ठरविण्याची पद्धतच चुकीची

By admin | Updated: December 9, 2014 23:18 IST

रघुनाथदादा पाटील : साखरेच्या दरावरच ऊसदर

कोपार्डे : साखरेच्या दरावरच ऊसदर ठरविण्याची प्रथा चुकीची आहे. त्यामुळे साखरेचे दर घसरले की, आमच्याकडे साखर उत्पादन प्रतिक्विंटल एवढा खर्च आला असून, अमुक एवढेच पैसे आम्ही देऊ शकतो, ही कारखानदारांची भूमिका बेकायदेशीर असून, ऊसउत्पादनाचा वास्तव खर्च पकडून एफआरपी ठरविणे गरजेचे आहे. सी. रंगराजन समितीने सुचविलेल्या शिफारशी तरी प्रामुख्याने अंमलात आणाव्यात. यासाठी आपण ‘संघर्ष यात्रा’ सुरू केल्याचे शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.कुडित्रे (ता. करवीर) येथे कुंभी कासारी कारखान्यावर ऊसदर संघर्ष यात्रेचे आगमन सोमवारी झाले. यावेळी पत्रकार परिषदेत रघुनाथदादा बोलत होते. एफआरपीसाठी खताचा खर्च धरताना डी. ए. पी. खताचा दर ४०० रुपये धरला आहे. मात्र, प्रत्यक्षात तो ११०० रुपये आहे. शासनाचे पाटबंधारे खाते एकरी ७००० रुपये पाणीपट्टी आकारते. मात्र, एफआरपीसाठी हा खर्च फक्त २००० रुपये धरला आहे. यामुळे वास्तव उत्पादन खर्चात मोठी तफावत दिसत असून आजची एफआरपी गव्हाणीत ऊस टाकण्याच्या खर्चाएवढी आकारली जात आहे.आतापर्यंत एफआरपी न देणाऱ्या कारखानदारांच्या विरोधात संघर्ष होता. मात्र, आता जी बेकायदेशीर एफआरपी जाहीर केली जाते त्याच्या विरोधात संघर्ष उभा केल्याचे सांगत काँग्रेस शासनाला शेतकऱ्यांविरोधी भूमिका घेतली म्हणून जनतेने उलथून टाकले. विद्यमान भाजप शासनाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाला बगल दिल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप शासनाने साखर आयात करून ऊस उत्पादकांना बुडविण्याचे पातक केल्याचा आरोप करताना डब्ल्यूटीओच्या करारानुसार प्रक्रिया केलेल्या कोणत्याही मालावर आयात कर ३०० टक्क्यापर्यंत लावता येतो. यातील केवळ १०० टक्के जरी साखरेच्या आयातीवर १०० टक्के जरी कर लावला तरी साखर ५० रुपये होईल. मग देशात उत्पादित झालेली साखर ४५ रुपये प्रतिकिलो जनता का घेणार नाही, असा सवालही त्यांनी केला. (वार्ताहर)जबाबदारी शासनाचीसाखर जीवनावश्यक वस्तूत आहे. ज्यावेळी उत्पादन खर्चापेक्षा एखाद्या जीवनावश्यक वस्तूला बाजारात कमी दर मिळत असेल, तर त्याची भरपाई शासनाने द्यावयाची आहे. आता साखरेचे दर घसरले आहेत. ते उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने त्याची भरपाई कारखान्यांना देण्याची जबाबदारी शासनाचीच आहे.